• Download App
    अखिलेश यादव यूपीच्या मैनपुरीत पत्नीच्या प्रचारात मग्न; पण गुजरातमध्ये भाजप हरण्याचा आशेवर!!Akhilesh Yadav didn't even turn up to gujrat, but expressed his desire to defeat BJP in gujrat polls

    अखिलेश यादव यूपीच्या मैनपुरीत पत्नीच्या प्रचारात मग्न; पण गुजरातमध्ये भाजप हरण्याचा आशेवर!!

    वृत्तसंस्था

    मैनपुरी : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव उत्तर प्रदेशात मैनपुरी लोकसभा मतदारसंघात आपली पत्नी डिंपल यादव यांच्या प्रचारासाठी गेला आठवडाभर जीवाचे रान करत होते. आज तिथे पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. पण याच पोटनिवडणुकीतल्या मतदानाच्या दिवशी अखिलेश यादव यांनी मात्र गुजरातमध्ये भाजपचा पराभव होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. Akhilesh Yadav didn’t even turn up to gujrat, but expressed his desire to defeat BJP in gujrat polls

    हेच अखिलेश यादव गुजरातची अख्खी विधानसभा निवडणूक झाली, प्रचार संपला आज मतदान होत आहे. पण तोपर्यंत गुजरातकडे फिरकले देखील नव्हते. त्या उलट त्यांनी आपले सगळे लक्ष मैनपुरी लोकसभा मतदारसंघावरच केंद्रित केले होते. मैनपुरी लोकसभा मतदारसंघ उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि अखिलेश यादव यांचे पिताश्री मुलायम सिंह यादव यांचा होता. ते तिथून खासदार होते. त्यांच्या निधनानंतर त्या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे आणि तिथे अखिलेश यादव यांनी आपल्या पत्नी डिंपल यादव यांना उभे केले आहे.

    स्वतः अखिलेश गेल्या आठवडाभरापासून डिंपल यादव यांच्यासाठी मैनपुरी मतदारसंघातच तळ ठोकून होते. तेथे त्यांनी प्रचाराचा जोरदार धडाका लावला होता. पण आज प्रत्यक्ष मतदान होताना मात्र त्यांनी मैनपुरीतूनच गुजरात मध्ये भाजपचा मोठा पराभव होईल अशी आपल्याला आशा वाटते, असे वक्तव्य केले आहे. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियात राजकीय खिल्लीचा विषय ठरला आहे.

    Akhilesh Yadav didn’t even turn up to gujrat, but expressed his desire to defeat BJP in gujrat polls

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील