• Download App
    म्हणे, आफताब एकलकोंडा होता, उघडा डोळे बघा नीट, त्याची "ही" एकलकोंडी!Aftab was single, open your eyes and see well

    म्हणे, आफताब एकलकोंडा होता, उघडा डोळे बघा नीट, त्याची “ही” एकलकोंडी!

    प्रतिनिधी

    मुंबई : लव्ह जिहादच्या प्रकरणात आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धा वालकरची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. ते फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतरही तो एका मुलीबरोबर त्याच फ्लॅटवर डेटिंग करत होता. असे असतानाही काही मराठी माध्यमांनी वेगळे नॅरेटिव्ह चालवून आफताब विषयी छुपी सहनभूती किंवा सॉफ्ट कॉर्नर तयार होईल अशा बातम्या दिल्या आहेत. Aftab was single, open your eyes and see well

    या पैकी एक बातमी त्याच्या आई-वडिलांचा हवाला देऊन केली आहे. आफताब हा एकलकोंडा होता. त्याने उच्च शिक्षण घ्यावे, असे म्हणे त्याच्या वडिलांना वाटत होते. त्याने श्रद्धा बरोबर राहू नये, असे आई-वडिलांचे मत होते. पण, त्याने त्यांचे ऐकले नाही आणि तो श्रद्धा बरोबर निघून गेला. आफताबला आपल्या जीवनात पुढे काय करायचे होते ही कधी समजलेच नाही, अशा आशयाच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत.

    इतकेच काय पण आफताब एवढा निर्दयी होऊन खून करेल असे आम्हाला वाटतही नसल्याचे आई-वडिलांचे म्हणणे होते. आफताबला श्रद्धाच्या निर्घृण खुनात अटक झाल्यानंतर आता त्याचे आई-वडील दिल्लीला गेले आहेत… पण त्यांनी आफताब एकलकोंडा होता असे सांगितले आहे, त्यांना एक्सपोज करणारे काही फोटो सोशल मीडियावर दिसत आहेत. आफताब हा एकाच वेळी अनेक मुलींबरोबर अफेयर्स होती, हेच त्यातून दिसून येत आहे.

    साध्वी प्राची यांनी हे फोटो आपल्या फेसबुक अकाउंट वरून शेअर केले आहेत. हे पाहिल्यावर तो “किती एकलकोंडा” होता की अन्य काही होता, हे स्पष्ट दिसते. हे सर्व फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरून घेतलेले आहेत आणि त्यातल्या तारखा आणि वर्षे स्पष्ट दिसत आहेत. तो फुड ब्लॉगर होता. त्याचे 28000 फॉलोवर्स होते आणि म्हणे तो एकलकोंडा होता…

    Aftab was single, open your eyes and see well

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे