वृत्तसंस्था
मुंबई : Mumbai मुंबईतील चेंबूर भागातील सिद्धार्थ नगरमध्ये एका 3 मजली इमारतीला आग लागली, त्यात एकाच कुटुंबातील 3 मुलांसह 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. रविवारी पहाटे 5.20 वाजता ही घटना घडली. सर्वात आधी तळमजल्यावर असलेल्या दुकानात ही आग लागल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.Mumbai
माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. काही वेळातच आग वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली, मात्र तेथे राहणाऱ्या लोकांना वाचवता आले नाही.
आग विझविल्यानंतर त्यांना राजावाडी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पॅरिस गुप्ता (7 वर्षे), मंजू प्रेम गुप्ता (30 वर्षे), अनिता गुप्ता (39 वर्षे), प्रेम गुप्ता (30 वर्षे) आणि नरेंद्र गुप्ता (10 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. उर्वरित 2 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही.
सध्या आगीचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. शॉर्टसर्किटमुळे दुकानात स्फोट झाला आणि आग संपूर्ण इमारतीत पसरली.
7 people including 3 children die in fire in Mumbai; The fire in the shop on the ground floor reached the first floor
महत्वाच्या बातम्या
- kisan Sanman Nidhi : 9.4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20000 कोटी रुपये येणार ; मोदी जारी करणार 18वा हप्ता
- Haryana Exit Poll : हरियाणात एक्झिट पोलच्या बळावर काँग्रेसचे 3 – 4 मुख्यमंत्री एकदम चढले गादीवर!!
- Haryana : हरियाणामध्ये मतदानादरम्यान भाजपची मोठी कारवाई
- PM Modi targets : महाराष्ट्र दौऱ्यात राहुल गांधींचे जुनेच संविधान नॅरेटिव्ह; पण मोदींच्या ड्रग्स विरोधी हल्ल्यात काँग्रेस गारद!!