विशेष प्रतिनिधी
मुंबई : अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या राज्यातील १ लाख २४ हजार ७१५ बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून सुमारे ६९ कोटी इतका निधी मजूर केला आहे. या नैसर्गिक आपत्तीत सुमारे ६८९२६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून शेतपिकांचे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी शुक्रवारी राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून शासन निर्णय जारी केला.
राज्यातील नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोकण परिसरातील शेतकऱ्यांना जून २०२४ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीचा फटका सहन करावा लागला. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदतीचा हात दिला आहे. राज्यातील या पाच विभागीय आयुक्तालय क्षेत्रात एकूण १२९९९.८७ इतके हेक्टर बाधित झाले असून ३५ हजार ४५८ बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे. या विभागासाठी २३ कोटी ७२ लाख ९३ लाख इतका निधी शासनाने मंजूर केला आहे.
छत्रपती संभाजीनगरात २६०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून बाधित शेतकऱ्यांची संख्या ५०११ आहे. त्यांना ३५३.६० लाख निधी मंजूर झाला आहे. नाशिक विभागात २२८७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून ३७३६ शेतकरी बाधित झाले आहेत. नाशिकला ६९१.५० लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे विभागात १११६.८१ हेक्टर बाधित झाले असून ४०४८ शेतकरी बाधित झाले आहेत. पुण्यासाठी ३५३.६० लाख निधी मंजूर झाला आहे.
69 crores sanctioned to farmers affected by heavy rains, floods, cyclones
महत्वाच्या बातम्या
- PM Vishwakarma Yojana : पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
- Nitesh Rane : वड्याचे तेल वांग्यावर; राष्ट्रवादीकडून नवाब मलिक प्रकरणाची आगपाखड नितेश राणेंवर!!
- Rameshbhai oza : आपले कार्य उपकार नाही, तर साधना : रमेशभाई ओझा; वनवासी कल्याण आश्रमाचे हरियाणात राष्ट्रीय कार्यकर्ता संमेलनाचे उद्घाटन
- Hezbollah : पेजर-वॉकी-टॉकी स्फोटानंतर, हिजबुल्लाच्या गडावर आणखी एक हल्ला