• Download App
    कोरोनाने राज्यात घेतला तब्बल ४५० वीज कर्मचाऱ्यांचा बळी, तेरा हजार जणांना लागण |450 MSEB workers died due to corona

    कोरोनाने राज्यात घेतला तब्बल ४५० वीज कर्मचाऱ्यांचा बळी, तेरा हजार जणांना लागण

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण अशा तीन कंपन्यांमधील तब्बल १३ हजार ३५० कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. त्यापैकी सुमारे ४५० कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान कोरोनाने मृत्यू झाला आहे.450 MSEB workers died due to corona

    कोरोना काळातही अखंडित वीजपुरवठ्यासाठी तीन्ही कंपन्यांचे कर्मचारी, अभियंते व अधिकारी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. तिन्ही कंपन्यांमधील १३ हजार ३५० कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला आहे.



    सरकारी कर्मचाऱ्यांच्याप्रमाणे वीज कर्मचाऱ्यांनाही ‘फ्रंटलाईन वर्कर’चा दर्जा देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने सात दिवस काम बंद आंदोलन केले.

    ऊर्जा विभागाच्या आश्वासनांनुसार संघटनांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र, मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारने मदत जाहीर करावी, अशी संघटनेची मागणी आहे.

    450 MSEB workers died due to corona

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची