• Download App
    कोरोनाने राज्यात घेतला तब्बल ४५० वीज कर्मचाऱ्यांचा बळी, तेरा हजार जणांना लागण |450 MSEB workers died due to corona

    कोरोनाने राज्यात घेतला तब्बल ४५० वीज कर्मचाऱ्यांचा बळी, तेरा हजार जणांना लागण

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण अशा तीन कंपन्यांमधील तब्बल १३ हजार ३५० कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. त्यापैकी सुमारे ४५० कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान कोरोनाने मृत्यू झाला आहे.450 MSEB workers died due to corona

    कोरोना काळातही अखंडित वीजपुरवठ्यासाठी तीन्ही कंपन्यांचे कर्मचारी, अभियंते व अधिकारी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. तिन्ही कंपन्यांमधील १३ हजार ३५० कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला आहे.



    सरकारी कर्मचाऱ्यांच्याप्रमाणे वीज कर्मचाऱ्यांनाही ‘फ्रंटलाईन वर्कर’चा दर्जा देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने सात दिवस काम बंद आंदोलन केले.

    ऊर्जा विभागाच्या आश्वासनांनुसार संघटनांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र, मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारने मदत जाहीर करावी, अशी संघटनेची मागणी आहे.

    450 MSEB workers died due to corona

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Assam Govt : आसाममध्ये 40 लाख महिलांच्या खात्यात ₹9000 हस्तांतरित; 4 महिन्यांचे पैसे एकाच वेळी पाठवले, मुख्यमंत्र्यांनी सांगितले- निवडणुकीशी याचा काहीही संबंध नाही

    CBSE Class : CBSEच्या 12वीच्या पेपरवर गाण्याचा क्यूआर कोड; स्कॅन केल्यावर यू-ट्यूब लिंक उघडत आहे, CBSE ने म्हटले- चूक झाली, पण पेपर सुरक्षित

    Chandigarh Firm : अण्वस्त्र आणीबाणीच्या तयारीत खाडीतील देश; चंदीगडमधील औषध कंपनीकडे अणुआपत्तीत उपयुक्त ठरणाऱ्या 1 कोटी कॅप्सूलबाबत विचारणा