• Download App
    विषारी दारुचे बिहारमध्ये १६ बळी, पाच जण ताब्यात घेतले|16 died in hooch tragidy

    विषारी दारुचे बिहारमध्ये १६ बळी, पाच जण ताब्यात घेतले

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : पश्चिम चंपारण येथे गेल्या दोन दिवसात विषारी दारुचे प्राशन केल्याने सुमारे १६ जणांचा मृत्यू झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.16 died in hooch tragidy

    पश्चिाम चंपारण जिल्ह्यातील लौरिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १६ जणांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. कालपर्यंत मृतांचा आकडा ८ होता आणि तो १६ वर पोचला आहे. आजारी पडलेल्या नागरिकांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.



    परंतु मृतांचा आकडा वाढत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. याप्रकरणी स्थानिक नागरिक काहीच बोलण्यास तयार नाहीत. पोलिस म्हणाले की, याप्रकरणासंदर्भात ग्रामस्थांशी आणि पीडितांच्या नातेवाईकांशी चर्चा केली आहे. परंतु विषारी दारुचे पुरावे मिळाले नाही. तपास मात्र सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

    16 died in hooch tragidy

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jio Reaches : जागतिक पेटंट क्रमवारीत टॉप-20 मध्ये पोहोचले जिओ:असे करणारी एकमेव भारतीय टेक कंपनी बनली; 320 स्थानांची झेप घेतली

    NEET Re-Exam 2026 : NEET पुनर्परीक्षेपर्यंत प्रश्नपत्रिका तयार करणारे लॉकडाउनमध्ये राहतील; अनोळखी ठिकाणी मोबाईलशिवाय राहतील, कोणालाही भेटू दिले जाणार नाही

    Patna Coaching Row : रोशन आनंद यांचा दावा- खान सरांनी भावाला मारले:खान सर म्हणाले- नेपाळमध्ये आजाराने मृत्यू झाला