• Download App
    ऑॅगस्टमध्ये १५.१५ लाख भारतीयांनी गमावल्या आपल्या नोकऱ्या 15 lack peoples lost job in Aug

    ऑगस्टमध्ये १५.१५ लाख भारतीयांनी गमावल्या आपल्या नोकऱ्या

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – ऑगस्टमध्ये देशाचा बेरोजगारी दर ८.३२ टक्क्यांपर्यंत वाढल्याची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. सीएमआयईच्या आकडेवारीनूसार, आॅगस्टमध्ये तब्बल १५.१५ लाख भारतीयांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. 15 lack peoples lost job in Aug

    आकडेवारीनुसार, जुलैमध्ये देशाचा बेरोजगारी दर ६.९५ टक्के होता; मात्र ऑगस्टमध्ये त्यात १.३७ टक्क्यांनी वाढ होऊ हा दर आता ८.३२ टक्क्यांपर्यंत गेला आहे.



    शहरी बेराजगारीचे प्रमाण हे ग्रामीण भागापेक्षा अधिक आहे. जुलैमध्ये देशाचा शहरी बेरोजगारीचा दर ८.३ टक्के होता; आॅगस्टमध्ये हा दर तब्बल ९.७८ टक्क्यांवर गेला आहे; तर ग्रामीण बेरोजगारीचा दर जुलैमध्ये ६.३४ टक्के होता.

    त्यातही १.३ टक्क्याने वाढ होऊन हा दर आता ७.६४ टक्क्यांपर्यंत गेला आहे. या आकडेवारीनुसार, देशातील शहरांमध्ये जुलैमध्ये औपचारिक व अनौपचारिक क्षेत्रात जवळपास ३९.९३ कोटी लोकांना नोकऱ्या होत्या. आॅगस्टमध्ये ही संख्या ३९.७७ कोटीपर्यंत आली; तर ग्रामीण भागात जवळपास १३ लाख नोकऱ्या कमी झाल्या.

    15 lack peoples lost job in Aug

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shashi Tharoor : खेरा म्हणाले- मोदी जे बोलत नाहीत, ते थरूर ऐकतात; काँग्रेस खासदारांनी G7 परिषदेत भारतीय खलाशांचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल पंतप्रधानांचे कौतुक केले होते

    Pahalgam Attack : पहलगाम हल्ला- ड्रोनने पोहोचवली होती शस्त्रे:NIA च्या आरोपपत्रात खुलासा, गुप्तचर यंत्रणेच्या कमकुवतपणावर प्रश्नचिन्ह

    President Zardari : भारताने म्हटले- पाक राष्ट्रपतींचे विधान द्वेष पसरवणारे:आमच्या बाबतीत हस्तक्षेप करू नका; झरदारी म्हणाले होते- वाराणसीची मशीद धोक्यात