पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून फोन केल्यावर त्यांनी मन की बात केली, त्यापेक्षा काम की बात करायला हवी होती असे म्हणणारे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या झारखंडमध्ये कोरोना लसीकरणाच्या व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कोरोना प्रतिबंधक लसी वाया जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. Advised to PM to talk about work but not properly vaccinated in the state, 34 per cent corona vaccine wasted in Jharkhand
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून फोन केल्यावर त्यांनी मन की बात केली, त्यापेक्षा काम की बात करायला हवी होती असे म्हणणारे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या झारखंडमध्ये कोरोना लसीकरणाच्या व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कोरोना प्रतिबंधक लसी वाया जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
एका बाजुला देशात कोरोना प्रतिबंधक लसींची टंचाई आहे. मात्र, अनेक राज्यांना लसवापराचे गांभिर्य नाही. झारखंडमध्ये तर तब्बल ३४ टक्के लसी वाया गेल्या आहेत. केंद्र सरकारने झारखंड सरकारला चांगलेच फटकारले आहे.
- झारखंडमध्ये काँग्रेसच्या मुस्लिम आमदाराकडून शिवमंदिरात पूजा, भाजप खासदाराकडून आक्षेप ; नवा वाद पेटला
केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना कोरोना प्रतिबंधक लसी पाठविण्यात आल्या होत्या. या लसींच्या वापराचा अहवाल केंद्र सरकारने प्रसिध्द केला आहे. त्यानुसार झारखंड राज्यात सर्वादिक ३४ टक्के लसी वाया गेल्या आहेत.
पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांनी मात्र एकही लस वाया घालविली नाही. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये १ लाख ६२ हजार तर केरळमध्ये १ लाख १० हजार लसी शिल्लक राहू शकल्या.
केंद्र शासन राज्यांना कोरोना प्रतिबंधक लसी पाठवित आहे. लसीकरण करण्याची जबाबदारी राज्यांची आहे. मात्र, अनेक राज्यांत त्यासाठीच्या आवश्यक पायाभूत सुविधा उभारल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे लसी वाया जाण्याचे प्रमाण जास्त आहे. झारखंडमध्येही अशाच पध्दतीने लाखो लसी वाया गेल्या आहेत. त्यामुळे येथील अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी लस वाया गेल्याचा अहवाल नाकारला आहे. राज्यात यापूर्वी लस वाया जाण्याचे प्रमाण चार टक्यांवर होते. आता ते एक टक्यांवर आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
Advised to PM to talk about work but not properly vaccinated in the state, 34 per cent corona vaccine wasted in Jharkhand
महत्त्वाच्या बातम्या
- मानवी जीवनाला गती देणाऱ्या चारचाकी मोटारींचा अनोखा प्रवास
- अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकांना होतो बराच त्रास, अवमानास्पद वागणुकीत वाढ
- आता हव्या त्या वितरकाकडून भरून घेता येणार गॅस सिलेंडर, पुण्यात प्रायोगिक तत्वावर केंद्र सरकारचा निर्णय
- कॉँग्रेसमध्ये सुधारणांची प्रचंड आवश्यकता, अन्यथा तुमचे वाईट दिवस सुरू होतील म्हणत कपील सिब्बल यांचे पुन्हा राहूल गांधींवर शरसंधान
- कर्नाटकात नेतृत्व बदल नाही, येडीरुप्पांचे काम चांगले, तेच मुख्यमंत्रीपदी राहणार, भाजपाचे कर्नाटक प्रभारी अरुण सिंग यांनी केले स्पष्ट