Tuesday, 6 May 2025
  • Download App
    वेळ पडल्यास कठोर निर्बंध; लॉकडाऊनचा निर्णय राज्य सरकारचा : भारती पवार । Strict restrictions if time permits: Lockdown decision of the state government: Minister of State for Health Bharti Pawar

    WATCH : वेळ पडल्यास कठोर निर्बंध; लॉकडाऊनचा निर्णय राज्य सरकारचा – भारती पवार

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : वेळ पडल्यास कठोर निर्बंध लावणार असून लॉकडाऊनचा निर्णय राज्यसरकारचा असेल, असे केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनी सांगितले. Strict restrictions if time permits: Lockdown decision of the state government: Minister of State for Health Bharti Pawar

    सध्या देशामध्ये ओमीक्रोनसह कोरोनाची तिसरी लाट पसरत आहे. बाधित रुग्णांची संख्या देखील चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उपाययोजना केल्या आहेत. देशातील सर्वच राज्यांना केंद्रांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या काळजी करण्याचे कारण नसले तरी नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे अन्यथा वेळ पडल्यास कठोर निर्बंधांची अंमलबजावणी करावी लागेल, असा इशारा केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनी दिला. त्या सांगलीमध्ये माध्यमांशी बोलत होत्या.

    भारती पवार या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर होत्या. कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा आढावा घेण्यासाठी त्या सांगली दौऱ्यावर आल्या होत्या. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयास त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजपचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दीपक बाबा शिंदे, पृथ्वीराज पवार, महिला मोर्चाच्या स्वाती शिंदे यांच्यासह अनेक नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या. मंत्री भारती पवार यांचा यावेळी मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला.

    • वेळ पडल्यास कठोर निर्बंध लावणार
    • लॉकडाऊनचा निर्णय राज्य सरकारचा
    • नागरिकांनी काळजी घ्यावी, बेफिकीर राहू नये
    • कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करावे
    • सर्वच राज्यांना केंद्रांकडून खबरदारीच्या सूचना

    Strict restrictions if time permits: Lockdown decision of the state government: Minister of State for Health Bharti Pawar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर भव्य चित्रपट निर्मिती; चौंडी मध्ये फडणवीस मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीत निर्णय!!

    Devendra Fadnavis आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री फडणवीस