• Download App
    गणेशोत्सवासाठी पुण्यापाठोपाठ मुंबईतही जमावबंदी; पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही|section 144 imposed in mumbai for next 9 days ganesh festival

    गणेशोत्सवासाठी पुण्यापाठोपाठ मुंबईतही जमावबंदी; पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही

    वृत्तसंस्था

    मुंबई : गणेशोत्सवासाठी पुण्यापाठोपाठ मुंबईतही जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. मुंबई पोलिसांनी पुढील ९ दिवस शहरात कलम १४४ लागू केले आहे.section 144 imposed in mumbai for next 9 days ganesh festival

    पुण्यापाठोपाठ मुंबईतही जमावबंदीचा आदेश लागू केल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्रित जमण्यास बंदी आहे. मुंबई पोलिसांकडून आदेश जारी केले आहेत. पोलिसांच्या आदेशानुसार आता गणेशोत्सव काळात मिरवणुकांना परवानगी नसेल.नियमावलीनुसार प्रत्यक्ष मुखदर्शनास प्रतिबंध केला आहे. या दर्शनासाठी गर्दी न करण्याचं आवाहन केले आहे. अन्यथा कारवाई केली जाणार आहे.



    पुण्यातही दहा दिवस १४४ कलम लागू

    पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. यासाठी खबरदारी म्ह्णून गणेशोत्सवाच्या दहा दिवसात जमावबंदी (१४४ कलम) लागू आहे. १० ते १९ सप्टेंबरसाठी हा आदेश लागू असून उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे,

    असा इशारा पुणे शहर पोलिस सहायुक्त डॉ.  रवींद्र शिसवे यांनी दिला. शहर पोलीस दलाकडून ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

    section 144 imposed in mumbai for next 9 days ganesh festival

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ajit Pawar Plane Crash : AAIB चा प्राथमिक चौकशी अहवाल- अजित पवारांचे विमान कोसळण्यापूर्वी झाडाला धडकले:’ब्लॅक बॉक्स’ आणि ‘FDR’ खराब

    Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास; गोविंद फड यांची मनोज जरांगेंना थेट धमकी

    CM Devendra Fadnavis : अजित पवारांच्या विमान अपघातावर पतंगबाजी नको; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन; कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेचा विचार करण्याचा सल्ला