• Download App
    साताराची कन्या अपूर्वा अलाटकर ठरली पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला लोकोपायलट! Sataras daughter Apoorva Alatkar became the first woman loco pilot to run Pune Metro

    साताराची कन्या अपूर्वा अलाटकर ठरली पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला लोकोपायलट!

    उदयनराजे भोसले यांनी केले खास कौतुक म्हणाले…

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच पुणे मेट्रोचे लोकार्पण झाले. यावेळी आणखी एक मोठी गोष्ट घडली. पुणे मेट्रोचं स्टेअरिंग प्रथमच एका महिलेने सांभाळाल्याचं समोर आलं. साताराची अपूर्वा अलाटकर ही पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला लोकोपायलट ठरली आहे.  Sataras daughter Apoorva Alatkar became the first woman loco pilot to run Pune Metro

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर अपूर्वाने ‘मास्क ऑन की’चा वापर करत वनाझ ते मेट्रो रूबी क्लिनिककडे मार्गस्थ केली आणि यशस्वीपणे प्रवास पूर्ण केला. या प्रवासात कंट्रोलरच्या विविध सूचनांचे व्यवस्थित पालन केले.

    अपूर्वा अलाटकर हिच्या कामगिरीबद्दल उदयनराजे भोसले यांनी ‘’साताऱ्याची कन्या अपूर्वा अलाटकर पुणे मेट्रो चालवणारी पहिला महिला ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर अपूर्वाने मास्क ऑन की चा वापर करत मेट्रो मार्गस्थ केली. अपूर्वाच्या कामगिरीबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे तिला पुढील वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा.’’ अशा शब्दांमध्ये तिचे अभिनंदन केले आहे.

    साताऱ्यातील सुरेखा यादव या वंदे भारत ट्रेन चालवणाऱ्या आशिया खंडातील पहिल्या महिला लोकोपायट ठरल्या होत्या. त्यांच्यानंतर आता साताऱ्याची कन्या अपूर्वा अलाटकर ही पुणे मेट्रो चालवणारी पहिला महिला ठरली आहे.

    Sataras daughter Apoorva Alatkar became the first woman loco pilot to run Pune Metro

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो; खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का?