• Download App
    संजय राऊतांचं थेट सोमय्यांना पत्र! ‘तो’ 500 कोटींचा घोटाळा सोमय्यांनी उघड करा' |Sanjay Raut's letter directly to Somaiya! Somaiya exposes Rs 500 crore scam

    संजय राऊतांचं थेट सोमय्यांना पत्र! ‘तो’ 500 कोटींचा घोटाळा सोमय्यांनी उघड करा’

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे भ्रष्टाचार उघडकीस आणत आहेत. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांनाच पत्र लिहून मोठा स्फोट केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली ५०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा झाल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.Sanjay Raut’s letter directly to Somaiya! Somaiya exposes Rs 500 crore scam

    संजय राऊत यांनी ट्वीट करून दोन पत्र सोमय्यांना लिहिलं आहे. या प्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून चौकशी व्हावी अशी मागणीच राऊत यांनी सोमय्यांकडे केली आहे.



    नेमक काय लिहिलं आहे या पत्रात

    संजय राऊत यांनी सोमय्या यांना लिहिलेल्या पत्रात पिंपरी चिंचवड पालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात ५०० ते ७०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा केला आहे. “पिंपरी चिंचवड दौऱ्यात सुलभा उबाळे आणि इतर प्रमुख नेत्यांनी माझ्याकडे या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे सोपवली.

    २०१८-१९ या आर्थिक वर्षात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शेकडो कोटींच्या निविदा काढण्यात आल्या. या निविदा सदोष होत्या. यात क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि आर्कुस या दोन कंत्राटदारांना ५०० कोटीपेक्षा अधिकची कंत्राटे देण्यात आली. ”

    पुढे संजय राऊत म्हणले की , कामांसाठी ठरवून दिलेली मुदत संपूनही ५० टक्के कामेही या कंत्राटदारांनी पूर्ण केली नाहीत. दोन कंपन्यांच्या हितासाठी हे सगळं करण्यात आलं आणि सरकार व जनतेचा पैसा या कंत्राटदारांच्या घशात घालण्यात आला.

    तसेच संपूर्ण प्रकल्पातच मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून आपण अनेक घोटाळे बाहेर काढले असल्याने मी तुमचे या घोटाळ्याकडे लक्ष वेधत आहे, असे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे. या घोटाळ्याचे पुरावे असलेली संपूर्ण फाइल मी तुमच्याकडे सोपवत आहे, असे नमूद करताना त्याचे कारणही राऊत यांनी पुढे नमूद केले आहे.

    Sanjay Raut’s letter directly to Somaiya! Somaiya exposes Rs 500 crore scam

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadanvis : घराचे स्वप्न आता वास्तवात; महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल; ग्रामीण भागातील घरांसाठी 80000 कोटींची गुंतवणूक!!

    MHADA : मुंबईत पावसाळ्यापूर्वी ‘म्हाडा’चा मोठा निर्णय!

    Bakri Eid : बकरी ईदच्या आधी विहिंप, बजरंग दल सतर्क; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!