पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील हिंसाचारात सरकारकडून एकतर्फी कारवाई केली जात असल्याचा आरोप केला जातो, त्यामुळे आज भाजप राज्यभर आक्रमक आंदोलन करत आहे. यावर तुमचे काय म्हणणे आहे? तर संजय राऊत म्हणाले, “अमरावती हिंसाचारावर भाजपने आक्रमक होण्यात काय अर्थ आहे? तुम्ही पुन्हा दंगल भडकावत आहात का? राजकीय भाकरी भाजण्यासाठी आक्रमकता दाखवू नका. अमरावती शांत आहे, आगीत तेल ओतू नका.” sanjay raut Criticizes devendra fadnavis over agitation against violence in nanded malegaon amravati
वृत्तसंस्था
मुंबई : त्रिपुराच्या घटनेुळे महाराष्ट्रातील नांदेड, मालेगाव आणि अमरावती येथे हिंसाचाराच्या घटना घडल्या. यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अमरावतीला भेट दिली. पत्रकारांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले की, अमरावती हिंसाचारप्रकरणी एकतर्फी कारवाई करण्यात आली आहे. हिंदू संघटनांशी संबंधित सदस्यांनाच लक्ष्य करण्यात आले. 13 तारखेला झालेला हिंसाचार ही 12 तारखेला झालेल्या हिंसाचाराची प्रतिक्रिया होती. मात्र, 12 तारखेच्या हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्यांना सोडून देण्यात आले. तर 13 रोजी पोलिसांनी लाठीमार करून कारवाई केली. त्याविरोधात भाजप आज (22 नोव्हेंबर, सोमवार) राज्यभर आक्रमकपणे धरणे आंदोलन करत आहे. यावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.
पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील हिंसाचारात सरकारकडून एकतर्फी कारवाई केली जात असल्याचा आरोप केला जातो, त्यामुळे आज भाजप राज्यभर आक्रमक आंदोलन करत आहे. यावर तुमचे काय म्हणणे आहे? तर संजय राऊत म्हणाले, “अमरावती हिंसाचारावर भाजपने आक्रमक होण्यात काय अर्थ आहे? तुम्ही पुन्हा दंगल भडकावत आहात का? राजकीय भाकरी भाजण्यासाठी आक्रमकता दाखवू नका. अमरावती शांत आहे, आगीत तेल ओतू नका.”
ठाकरे सरकार कायद्यानुसार कारवाई करते, जात-धर्म पाहत नाही : राऊत
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे. येथे कायद्यानुसार कारवाई करताना जात, धर्म, पक्ष पाहिला जात नाही. विरोधी पक्षनेतेही मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करू नये. अमरावतीसारखी घटना कोणाच्याही हिताची नाही. या राज्याचे पोलीस सक्षम आहेत. गडचिरोलीमध्ये या पोलिसांनी 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. एकतर्फी कारवाई केल्याच्या आरोपात तथ्य नाही. भाजप कार्यकर्त्यांच्या अटकेचा अर्थ हिंदूंवर कारवाई झाली, असे नाही. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी अशा प्रकरणी व्यर्थ विधाने करणे टाळावे.”
भाजपचे आंदोलन कशासाठी? महागाईसाठी?
संजय राऊत यांनी भाजपकडून करण्यात येत असलेल्या राज्यव्यापी धरणे निदर्शने आणि आंदोलनांचे औचित्य काय असा सवाल केला. संजय राऊत म्हणाले, भाजप आक्रमक का आहे, त्यांना पुन्हा दंगल करायची आहे का? भाजप आंदोलन का करत आहे? महागाई विरोधात तुम्ही काय करत आहात? की चीन घुसला म्हणून असे करत आहात? वातावरण शांत आहे, शांतता नांदू द्या.”
‘चीन सीमेत घुसला, तिथेही गुप्तचर यंत्रणा अपयशी’
राज्य सरकारचे गुप्तचर नेटवर्क अपयशी ठरल्याच्या आरोपावर तसेच सरकार बेफिकीर होते आणि महाराष्ट्रातील अनेक भागात हिंसाचार उसळला यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, गुप्तचर नेटवर्कमध्ये बिघाड कुठे होत नाही. दिल्लीत घडते. गाजीपूरमध्ये घडते. चीनचे लोक आत घुसले, तिथेही असे घडते. काश्मीरमध्ये घडते. माणसं आहेत. फक्त महाराष्ट्राच्या गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाचीच चर्चा का?”
फडणवीस सरकारने रझा अकादमीवर बंदी का घातली नाही?
काल अमरावतीच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला होता की, काँग्रेसच्या राजवटीत रझा अकादमीचे लोक पोलिसांवर का हल्ले करतात? मुंबईतही रझा अकादमीने पोलिसांवर हल्ला केला तेव्हा तिथे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते. रझा अकादमी ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप संजय राऊत यांनी यापूर्वीच्या एका वक्तव्यात केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तसे असेल तर रझा अकादमीवर बंदी घालावी, अशी भाजपची मागणी आहे, ही हिंमत आहे का? त्यावर आज प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, तुमच्यात हिम्मत असेल तर तुमचे सरकार असताना रझा अकादमीवर बंदी का नाही घातली? दरम्यान, अमरावतीमध्ये तणाव लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने मोठा निर्णय घेतला. खबरदारी म्हणून पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
sanjay raut Criticizes devendra fadnavis over agitation against violence in nanded malegaon amravati
महत्त्वाच्या बातम्या
- PROUD STORY : सातारा जिल्ह्यातील गांजे गावातील लेकीची सैन्यात निवड; ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण; शिल्पा चिकणे यांचे भव्य स्वागत
- पवारसाहेब कुणा कुणासाठी हिशेब मागणार : सोमय्या; राज्यात इंधन महाग आणि विदेशी दारू स्वस्त का ?
- सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, सुधीर मुनगंटीवार यांची महाविकास आघाडी सरकारवर टीका
- कोरोना लसीच्या बुस्टर डोसची गरज नाही, आयसीएमआरने केले स्पष्ट
- कृषि कायदे रद्द केल्याने झळाळून उठली पंतप्रधानांची प्रतिमा, मोदीच खरे शेतकरी समर्थक असल्याचे सर्व्हेक्षणात नागरिकांनी केले व्यक्त
- पाकव्याप्त काश्मीर परत मिळविणे सरकारचा पुढचा अजेंडा, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचा विश्वास