• Download App
    Raj Thackeray On Sharad Pawar : शरद पवारांना जातीपातीचं राजकारण हवंय, राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच याची सुरुवात - राज ठाकरे|Raj Thackeray On Sharad Pawar Sharad Pawar wants caste politics, it started only after the birth of NCP - Raj Thackeray

    Raj Thackeray On Sharad Pawar : शरद पवारांना जातीपातीचं राजकारण हवंय, राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच याची सुरुवात – राज ठाकरे

    गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर झालेल्या सभेतील राज ठाकरे यांच्या भाषणाची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे. मनसे प्रमुखांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आपल्या खास शैलीत हल्लाबोल केला. आपल्या भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी जातीपातीच्या राजकारणावर बोट ठेवून यासाठी राष्ट्रवादी जबाबदार असल्याचा आरोप केला.Raj Thackeray On Sharad Pawar Sharad Pawar wants caste politics, it started only after the birth of NCP – Raj Thackeray


    प्रतिनिधी

    मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर झालेल्या सभेतील राज ठाकरे यांच्या भाषणाची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे. मनसे प्रमुखांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आपल्या खास शैलीत हल्लाबोल केला. आपल्या भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी जातीपातीच्या राजकारणावर बोट ठेवून यासाठी राष्ट्रवादी जबाबदार असल्याचा आरोप केला.

    ‘जातीपातीत गुंतून पडलो तर कसलं हिंदुत्व?’

    राज ठाकरे म्हणाले की, आपण जातीपातीमध्ये गुंतून पडणार असू तर कोणतं हिंदू आणि हिंदुत्व आपण घेऊन बसणार. हिंदू हा हिंदू मुस्लीम दंगलीत फक्त हिंदू असतो. तो २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला भारतीय होतो. चीननं आक्रमण केल्यावर त्याला आपण कोण कळतच नाही. मग ज्यावेळी त्याला कळतच नाही तेव्हा तो मराठी, गुजराती, तामिळ असा होतो. मग तो ज्यावेळी तो मराठी होतो, त्यावेळी तो मराठा, ब्राह्मण, आग्री असा होतो. राष्ट्रवादी काँग्रेसला, शरद पवारांना ही गोष्ट हवी आहे.”



    ‘शरद पवारांना हवं जातीपातीचं राजकारण’

    राज ठाकरे पुढे म्हणाले की, “जातीपातीचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसला, शरद पवारांना हवं आहे. 1999 मध्ये जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हा जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू झालं. यापूर्वी जात ही जातीचा अभिमान होता. परंतु 1999 मध्ये राष्ट्रवादीच्या जन्मानंतर त्यांनी जातीचा द्वेष करायला लावला,” असा आरोपही राज ठाकरे यांनी केला.

    जातिभेदात खितपत पडला महाराष्ट्र

    राज पुढे म्हणाले की, छत्रपतींवरील पुस्तक बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिले, ते ब्राह्मण! मग त्यांनी चुकीचे लिहिले असणार!! आम्ही इतिहास वाचत नाहीत, शिवाजी महाराजांना जाती-पातीची संकल्पना मान्य नव्हती. महाराष्ट्राची परंपरा वैभवशाली पण तो महाराष्ट्र जातिभेदात खितपत पडला. महाराष्ट्राची अवस्था अजून किती वाईट करायची? जेम्स लेन हा भिकारडा होता? त्याने माँसाहेब जिजाऊंबद्दल काय लिहिले माहीतच आहे,

    आ्म्हीच आमची अब्रू काढतो, त्यावरून इथे राजकारण जाणूनबुजून तापवलं जातं. आपणही त्याच्यावर चर्चा करत बसतो याची लाज वाटते. आम्हाला कसलेही भान नाही. निवडणुकीत जनतेला पैसे वाटून वेडेपिसे करायचे असा प्रघात सुरू आहे. जातीपातीतून आपण बाहेर येत नाही. हिंदू म्हणून आपण कधी एक होणार आहोत? असा सवालही त्यांनी केला.

    Raj Thackeray On Sharad Pawar Sharad Pawar wants caste politics, it started only after the birth of NCP – Raj Thackeray

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस