• Download App
    पुणे : नवगुरू संस्थानच्या ४८ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा ; प्रकृती स्थिर। Pune: Food poisoning of 48 students of Navguru Sansthan; Nature stable

    पुणे : नवगुरू संस्थानच्या ४८ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा ; प्रकृती स्थिर

    विषबाधा नेमकी कशामुळे झाली हे अद्याप स्पष्ट नाही.परंतू खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने पाणी आणि अन्नाचे नमुने घेतले आहेत. Pune: Food poisoning of 48 students of Navguru Sansthan; Nature stable


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील खोपी गावात नवगुरू संस्थानच्या ४८ विद्यार्थीनींना अन्नातून विषबाधा झाली आहे. दरम्यान विषबाधा झालेल्या ४८ विद्यार्थींनींपैकी २२ विद्यार्थीनींवर भोर उपजिल्हा रुग्णालयात तर २० मुलींवर नसरापूर आरोग्य उपकेंद्रात उपचार सुरू असून उर्वरित सहा विद्यार्थ्यांवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर आहे.

    विषबाधा नेमकी कशामुळे झाली हे अद्याप स्पष्ट नाही.परंतू खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने पाणी आणि अन्नाचे नमुने घेतले आहेत.या मुली संस्थेच्या जवळ असलेल्या वसतीगृहात राहतात.यातील बहुतांश मुली या परराज्यातील आहेत. त्या शिक्षणासाठी या संस्थेत आल्या आहेत. या सर्व मुली नवगुरू संस्थेत सॉफ्टवेअर व्यावसायिक म्हणून प्रशिक्षण घेत आहेत.



    नेमक काय घडलं?

    आरोग्य अधिकारी डॉ. अनंत साबणे यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री जेवण केल्यानंतर यातील चार-पाच मुलींना पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला.दरम्यान मंगळवारी यापैकी अनेक विद्यार्थिनींना हा त्रास वाढल्याने त्यांना नसरापूर येथील आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. या सर्व मुलींची प्रकृती स्थिर आहे.

    Pune: Food poisoning of 48 students of Navguru Sansthan; Nature stable

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !