• Download App
    अर्थचक्र पूर्वपदावर येण्यासाठी खासगी गुंतवणुक सुरु व्हावी - शक्तिकांत दास । Private Investment needed

    अर्थचक्र पूर्वपदावर येण्यासाठी खासगी गुंतवणुक सुरु व्हावी – शक्तिकांत दास

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ‘‘कोरोना काळात पीछेहाट झालेली भारतीय अर्थव्यवस्था आता पूर्ववत होण्याच्या बेतात आहे. मात्र ती पूर्ण क्षमतेनुसार वाढण्यासाठी खासगी भांडवली गुंतवणुकीचा प्रवाह वेगाने सुरु झाला पाहिजे,’’ असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले. Private Investment needed

    कायमस्वरूपी टिकणारा आणि स्थिर विकास हवा असल्यास खासगी गुंतवणुकीला तरणोपाय नाही, यावरही दास यांनी भर दिला. ‘‘कोरोनाकाळात अर्थव्यवस्था वाढीची गती मंदावली होती. आता कोरोना संपत आल्यावर तिच्यात अजूनही वेगाने आगेकूच करण्याची क्षमता आहे. मात्र खासगी गुंतवणुक हेच त्यावरील उत्तर आहे.



    अनेक अर्थतज्ज्ञांनी यावर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या वेगाचा अंदाज दहा टक्क्यांपासून साडेआठ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. मात्र रिझर्व्ह बँक आपल्या साडेनऊ टक्क्यांच्या अंदाजावर अजूनही कायम आहे. गुंतवणुकीचे खरे चक्र साधारण पुढील आर्थिक वर्षापासून सुरु होईल. मात्र तेव्हा बँकांनीदेखील गुंतवणुक करण्यासाठी सज्ज राहावे,’’ असे आवाहनही त्यांनी केले.

    Private Investment needed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadanavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- बंगालमध्ये महापरिवर्तन; भाजपचा विजय भारतात होणारी घुसखोरी अन् हल्ल्यांपासून वाचवणारा

    Sunetra Pawar : मतदारांचा विश्वास अजितदादांना समर्पित; विजयी मिरवणूक काढू नका, गुलालही उधळू नका, सुनेत्रा पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

    CM Fadnavis : मुख्यमंत्री म्हणाले- नसरापूर पीडितेच्या वडिलांशी दोनदा संवाद साधला, काही जणांकडून घटनेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न