विशेष प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ६ मार्चच्या दौऱ्यासंदर्भात महापालिका, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मेट्रो या सर्वांशी समनव्यय ठेऊन सूक्ष्म नियोजन केले जात आहे. आढावा बैठकीत सर्व ठिकाणांचा आढावा घेतला गेला असून याचा अहवाल शासकीय पातळीवर पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला जाणार आहे. याबाबत आढावा घेऊन पंतप्रधान कार्यालयाकडून अंतिम नियोजन जाहीर केले जाणार आहे. Prime Minister Narendra Modi will travel through Pune Metro March 6; Even Dedication of Shivaji Maharaj Statue Memorial
मोदी यांच्या पुणे दौऱ्याची जय्यत तयारी सुरु आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या दौऱ्याच्या नियोजनाची बैठक घेऊन प्रत्यक्ष जागांची पाहणी केली. येत्या ६ मार्च रोजी होणाऱ्या या दौऱ्यात पुणे महापालिका, गरवारे मेट्रो स्टेशन येथे पंतप्रधान मोदी भेट देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. याच सर्व ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा घेण्यात आला.
पुणे महापालिका आवारात साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ट पुतळा स्मारकाचे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पुणेकरांचे स्वप्न असणाऱ्या मेट्रोचे लोकार्पण करण्याचेही नियोजन आहे. मोदी मेट्रोच्या गरवारे स्थानकापासून आनंदनगर स्थानकापर्यंतचा प्रवास करणार आहेत. जवळ असणाऱ्या मैदानावर पुणेकरांना जाहीर कार्यक्रमाद्वारे संबोधित करण्याचेही प्रस्तावित आहे.
मोदी यांच्या दौऱ्याच्या नियोजन बैठकीस पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महामेट्रोचे महासंचालक ब्रिजेश दीक्षित, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, आयुक्त विक्रम कुमार, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर,पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, पीएमपीएमएल अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, काॅंग्रेस गटनेते आबा बागुल,सेनेचे गटनेते,पृथ्वीराज सुतार आदी उपस्थित होते.
Prime Minister Narendra Modi will travel through Pune Metro March 6; Even Dedication of Shivaji Maharaj Statue Memorial
महत्त्वाच्या बातम्या
- हवाईदलाच्या ताफ्यात तीन राफेल दाखल, एकूण संख्या झाली ३५
- तामीळनाडूमध्ये किन्नरशक्ती, तृतियपंथीयाचा निवडणुकीत विजय
- नवाब मलिकला पाठिंबा म्हणजे राष्ट्रवादीचे दाऊद टोळीचे समर्थन, रावसाहेब दानवे यांचा आरोप
- भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा विश्वास
- बिहारमध्ये दारू अड्डे शोधण्यासाठी आता हेलिकॉप्टरचा वापर