विशेष प्रतिनिधी
मुंबई – राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता किमान आठ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलाच असेल, तर आधी महाराष्ट्रातल्या उद्योजक, मजूर आणि नोकरदारांना दिलासा द्या आणि नंतर योग्य तो निर्णय घ्या, अशी सूचना भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांनी केली आहे. pankaja munde demands relief for industry, labours and employes
कोरोना परिस्थिती बाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी लॉकडाऊन बाबत सूचक वक्तव्य केले आहे. सर्वांनी नियमांचे पालन करण्याची आणि सहकार्य करण्यासाठी आवाहनही त्यांनी केले आहे.
पंकजा मुंडे ट्विटमध्ये म्हणतात, की ‘लॉकडाऊनमुळे जरी गरिबांची, व्यापाराची, अर्थव्यवस्थेची परिस्थिती कठीण होईल, तरी पर्याय काय आहे? कोरनीची साखळी कशी तोडणार? मजूर, उद्योजकांना आणि नोकरदारांना विश्वास देणे आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणांवरील भार हा गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
pankaja munde demands relief for industry, labours and employes
हे ही वाचा
- कोरोना लसीकरणातही ठाकरे – पवार सरकारच्या ऊर्जा मंत्री नितीन राऊतांना दिसला तथाकथित मनूवाद!!
- महाराष्ट्र सरकारची ब्रेक द चेन नियमावलीमध्ये नव्या बदलांचा समावेश; सरकारी, खासगी सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा
- रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन दुप्पट करा , आरोग्यमंत्री टोपे यांचे कंपन्यांना आवाहन ; ‘एमआरपी’ ही कमी करण्याचा सल्ला
- काँग्रेस – बद्रुद्दीन अजमल यांच्या पक्षाचे एकाच वेळी “हात वर” आणि “खिसे खालीही”!!; २० लोकांचा फेअरमाऊंटमधील निवासाचा खर्च काँग्रेस करणार
- राष्ट्रपती – पंतप्रधानही रूग्णालयात लस घेतात, मग महाराष्ट्रातले नेते कोण लागून गेलेत, की त्यांना घरी जाऊन लस द्यावी!!; मुंबई हायकोर्ट संतापले