कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यांमध्येही वाद सुरू झाला आहे. ऑक्सिजन कोणाला मिळावा यासाठी कोल्हापूरआणि सातारा जिल्ह्यांतील जिल्हाधिकारीच एकमेंकाशी भिडले.Oxygen tanker at the border and Kolhapur-Satara Collector clashed
विशेष प्रतिनिधी
सातारा : कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यांमध्येही वाद सुरू झाला आहे. ऑक्सिजन कोणाला मिळावा यासाठी कोल्हापूरआणि सातारा जिल्ह्यांतील जिल्हाधिकारीच एकमेंकाशी भिडले.
राज्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हा, शहर प्रशासन ऑक्सिजन मिळवण्यासाठी धडपडत आहे. सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी सीमेवरुन जाणारा ऑक्सिजन चा टँकर अडवला. यावरुन कोल्हापूर आणि सातारा जिल्हाधिकाºयांमध्ये वाद झाल्याचे पहायला मिळाला.
ऑक्सिजनचा टँकर आमचाच असल्याचा दावा कोल्हापूर आणि सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. त्यामुळे सध्या टँकर पोलीस बंदोबस्तात उभा आहे. ही घटना साताऱ्याच्या हद्दीवर घडली असून दोन जिल्हाधिकाऱ्यांची उच्च पातळीवर चर्चा झाली.
ऑक्सिजन टँकरवरुन वाद झाल्यानंतर फोनाफोनी केल्यानंतर तो टँकर सातारचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाच वेळी दोन टँकर निघाले होते. एका टँकरचा संपर्क तुटल्यामुळे ही गफलत झाली असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी फोनवरुन दिली.
तर संबधित टँकरचा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाशी काही संबध नाही. तो टँकर कोल्हापुरातल्या प्रायव्हेट उत्पादकाचा आहे. त्यातील आॅक्सिजन कोल्हापूर जिल्ह्यासाठी नाही. कोल्हापूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र टँकर येत आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
Oxygen tanker at the border and Kolhapur-Satara Collector clashed
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ऑक्सिजन देता का ऑक्सिजन…’ कोरोनाच्या सद्य : परिस्थितीवर विश्वनाथ गरुड यांची अंतर्मुख करणारी कविता
- सीएम केजरीवाल पंतप्रधान मोदींना का म्हणाले, गुस्ताखी माफ करा!, असे काय झाले मीटिंगमध्ये? वाचा सविस्तर…
- ऑक्सिजन निर्यातीचे खोटे वृत्त दिल्याने ‘मनिकंट्रोल’चा माफीनामा, चुकीच्या वृत्ताबद्दल व्यक्त केली दिलगिरी
- E-pass : राज्यात पुन्हा एकदा ई-पासची सुरुवात, कशी मिळवाल परवानगी? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप…
- भय इथले संपत नाही : कोरोना रुग्णांचा वाली कोण? सरकार मागच्या घटनांवरून धडा घेणार की नाही?
- असंवेदनशीलता : 13 बळी घेणाऱ्या विरार अग्निकांडावर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात, ही काही नॅशनल न्यूज नाही