वरळीत पुन्हा राष्ट्रवादीची ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाच्या शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे “थप्पड” भाषण गाजले असले, तरी बीडीडी चाळींच्या पुनर्वसन या विषयात आपलेही श्रेय असल्याचे राष्ट्रवादीने दाखवून दिले आहे. मुंबईत ज्या परिसरात शिवसेनेशी राष्ट्रवादीची थोडीबहुत स्पर्धा आहे ते क्षेत्र वरळीचे आहे. इथे शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधी राष्ट्रवादीने घेण्याचा प्रयत्न केला आहे. शरद पवारांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावरून हा राजकीय
अर्थ काढला जात आहे. NCP also showed its political ambitions in BDD chawl redevelopment program
मागील अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून, बीडीडीकरांचे घरांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. या गृहनिर्माण प्रकल्पाचा शुभारंभ वरळीपासून होणार आहे. या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झाला. परंतु, दहा वर्षांपूर्वी वरळी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यामुळे बीडीडीकरांच्या मतात आपलाही हक्क सांगण्यासाठी शरद पवार हेही व्हर्च्युअली उपस्थित राहिले. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेत या प्रकल्पाचे काम पुढे रेटल्याने, श्रेयाच्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेसनेही हिस्सेदारी सांगितल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
पंतप्रधान मोदींच्या भेटीत फक्त कोविड आणि बंगालच्या नामांतराची चर्चा ; ममता बॅनर्जी
– वरळीत पुन्हा ताकद वाढवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न
वरळी हा पूर्वी शिवसेनेचा गड असला, तरी पुढे तो राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर यांनी काबिज केला होता. परंतु अहिर यांनी आता शिवसेनेशी घरोबा केला आहे, त्यामुळे वरळीत बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या शुभारंभात शरद पवार यांना खास निमंत्रित करत, जितेंद्र आव्हाड यांनी याचे श्रेय राष्ट्रवादीकडे घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. या माध्यमातून वरळीत पुन्हा एकदा राष्ट्रवादीची ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत, राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहेत.
– बीडीडीकरांचा जीवनमानाचा दर्जा उंचावणार
मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत चाळींचा सर्वात मोठा वाटा आहे. शतकपूर्ती झालेल्या या चाळी आज अत्यंत जर्जर अवस्थेत आहेत. म्हणूनच शासनाने बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे नियोजन आखले आहे. पिढ्यानपिढ्या १६० चौरस फुटाच्या एका बहुपयोगी खोलीत संसार थाटणाऱ्या हजारो रहिवाशांना या पुनर्वसनातून ५०० चौ. फुटाची अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली सदनिका विनामूल्य मिळणार असून, येथील रहिवाशांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणार आहे. त्याचबरोबर सर्व सोयीसुविधांनीयुक्त एक टाऊनशिप निर्माण होणार आहे. ज्यामुळे नागरी सुविधांचे नियोजन उत्कृष्ट होण्यास मदत होणार आहे.
– भूकंपरोधक इमारती
वरळी येथे सर्वाधिक म्हणजे १२१ चाळी असून, वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात पुनर्वसनातून ९ हजार ६८९ पुनर्वसन सदनिका(निवासी ९३९४ + अनिवासी २९५) बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पात तळ + ४० मजल्यांच्या ३३ पुनर्वसन इमारती बांधल्या जाणार असून रुग्णालय, वसतिगृह, शाळा, जिमखाना इत्यादी सुविधांकरिता स्वतंत्र इमारतींची उभारणी केली जाणार आहे. नमुना सदनिकेचे बांधकाम पूर्ण झाले आहे. प्रत्येक सदनिकांमध्ये ८०० बाय ८०० मिलिमीटरच्या व्हिट्रिफाईड टाईल्स बसवण्यात येणार असून, खिडक्यांसाठी पावडर कोटिंगच्या अल्युमिनियम फ्रेमचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक इमारतीमध्ये ३ पॅसेंजर लिफ्ट, १ स्ट्रेचर लिफ्ट व १ फायर लिफ्टची सुविधा असणार आहे. पुनर्वसन क्लस्टरमध्ये मलनिःस्सारण प्रकल्प, सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग या पर्यावरण पूरक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. प्रत्येक पुनर्वसन इमारतीत तळ अधिक ६ मजली पोडियम पार्किंग व दोन प्रशस्त जिने असणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व पुनर्वसन इमारती भूकंपरोधक असणार आहेत.
– बीडीडी चाळीचा इतिहास
बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता या प्रकल्पाकडे नागरी पुनरुत्थानाचा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून पाहिले जाते. सन १९२० ते १९२४ या कालावधीत औद्योगिकरणामुळे शहरी भागांतून घरांची कमतरता प्रामुख्याने जाणवू लागली होती त्यामुळे मुंबई प्रोव्हिन्शिअल राज्याचे तत्कालीन राज्यपाल सर जॉर्ज लॉइड यांनी बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच बीडीडीची स्थापना करून मुंबई शहरात गृहनिर्मितीची योजना तयार केली . या योजनेअंतर्गत वरळी, एन. एम. जोशी मार्ग परळ , नायगाव आणि शिवडी येथे सुमारे ९२ एकर जागेवर बीडीडी चाळींची उभारणी करण्यात आली . या चाळींमध्ये औद्योगिक कामगार आणि गिरणी कामगार वर्ग प्रामुख्याने राहू लागला. शंभर वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बीडीडी चाळींमध्ये तर अनेक साहित्यिक , राजकीय नेते, कलाकार, अशी अनेक प्रतिष्ठित महापुरुष वास्तव्यास होते.
NCP also showed its political ambitions in BDD chawl redevelopment program
महत्त्वाच्या बातम्या
- जबरदस्त : जम्मू -काश्मिरात देशद्रोह आणि दगडफेक करणाऱ्यांना ना पासपोर्ट मिळणार, ना सरकारी नोकरी; आदेश जारी
- Inspiring : शेतमजुराची मुलगी बनली सीबीएसई 12 वीची टॉपर, अडचणींवर मात करत मिळवले 100 % गुण
- चर्चेची 12वी फेरी सकारात्मक : लडाखमधील 2 वादग्रस्त स्थळांवरून माघार घेण्यास चीन तयार, पीएलए हॉट स्प्रिंग आणि गोगरा पॉइंटमधून माघार घेणार
- आता तुम्ही तुमचे वय फेसबुकपासून लपवू शकणार नाही, १३ वर्षांपेक्षा कमी वयाचे युजर्स ओळखसाठी हे खास तंत्रज्ञान वापरणार
- अधिवेशनाचे २ आठवडे संसदेत नुसता गोंधळ : १०७ तासांपैकी केवळ १८ तास काम, १३३ कोटींचे नुकसान; राज्यसभा २१% , तर लोकसभेत फक्त १३% कामकाज