• Download App
    मुंबईसाठी पावसाळ्यातील २३ ते २८ जून खबरदारीचे, तब्बल १८ दिवस भरतीचा धोका।Metrological dept. gave alert for Mumbai

    मुंबईसाठी पावसाळ्यातील २३ ते २८ जून खबरदारीचे, तब्बल १८ दिवस भरतीचा धोका

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पावसाळ्यात जून ते सप्टेंबरदरम्यान १८ दिवस मुंबईला भरतीचा धोका आहे. या दिवसांत साडेचार मीटरहून अधिक उंचीची भरती समुद्राला येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जून महिन्यात सहा दिवस समुद्राला साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती येणार आहे. २५ आणि २६ जून रोजी ४.८५ मीटरची या मोसमातील सर्वात मोठी भरती आहे. २३ ते २८ जूनपर्यंत सलग साडेपाच मीटरहून अधिक उंचीची भरती समुद्राला येणार आहे. Metrological dept. gave alert for Mumbai



    समुद्राला भरती असताना जोरदार पाऊस आल्यास मुंबई जलमय होते. तसेच, पावसाळ्यात वाऱ्याचाही वेग जास्त असल्याने भरतीच्या वेळी उंच लाटा उसळतात. समुद्राला साडेचार मीटरहून अधिक भरती असल्यास ती धोक्याची मानली जाते.

    मुंबईतील पावसाळी पाणी नाल्यातून समुद्र अथवा खाडीत जाते. समुद्राला भरती आल्यास पावसाचे पाणी समुद्र किंवा खाडीत जात नाही. ते पाणी शहरात साचून राहते. त्यातच खाडी, नाल्यांमधून समुद्राच्या भरतीचे पाणी शहरात येते. समुद्राला भरती असताना मिठी नदीचे पाणी थेट कुर्ल्यांपर्यंत जाते. त्यामुळे पावसाळी पाण्याचा निचरा होत नाही.

    Metrological dept. gave alert for Mumbai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bawankule’s : सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशावर बावनकुळेंचे स्पष्टीकरण, भाजपचे दरवाजे सर्वांसाठी खुले

    Fadnavis : फडणवीस सरकारचा धाडसी निर्णय; राज्यातील 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘समृद्धी’चे लोकार्पण; नाव न घेता एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला