• Download App
    महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झाला आहे..तो थांबवण्यासाठी राज उद्धव यांनी एकत्र यावं.|Maharashtra politics, Raj Thakre uddav Thakre

    महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झाला आहे..तो थांबवण्यासाठी राज उद्धव यांनी एकत्र यावं.

    मनसे कडून शिवसेना भवनात बॅनर ..


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : महाराष्ट्राच्या राज्यकारणात वर्षभरानंतर पुन्हा एकदा रविवारी मोठ सत्तानाट्य घडलं . आणि राजकीय नाट्याचा चौथा अंक सुरू झाला. गेल्या काही महिन्यात नाराजीची चर्चा असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडली आणि विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा देत अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

    छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम,अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील आदी मंत्र्यांनी ही शपथ घेतली. हे सगळं सुरू असताना. महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील दिगू टिपणीस झाला आहे. अशी बोचरी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटर वरून दिली.

    ही प्रतिक्रिया आल्यानंतर राज ठाकरे यांचा या सगळ्या बाबतचा दृष्टिकोन लक्षात आला. आणि मनसेच्या वतीने शिवसेना भवन परिसरात बॅनर बाजिला उधाण आलं. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. आता तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी साद बॅनरच्या माध्यमातून घालण्यात आली आहे.

     



    मनसैनिक लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले आहेत.

    काही दिवसांपूर्वी राज ठाकरे भाजपाच्या वळचंनीला जातात का ? अशा काहीशा चर्चा होत्या . शिंदे गट आणि भाजप कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी होतं होत्या . मात्र या सत्ता नाट्यानंतर आलेली राज ठाकरे यांची प्रतिक्रिया काहीसं वेगळं सांगून जाते .

    येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी खरंच हे दोन भाऊ एकत्र येणार का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय जीनामा देत अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील हसनमुश्री धनंजय मुंडे धर्मराव बाबा आत्राम अदिती तटकरे संजय बनसोडे अनिल पाटील आदी मंत्र्यांनी ही शपथ घेतली .Maharashtra politics, Raj Thakre uddav Thakre

    Maharashtra politics, Raj Thakre uddav Thakre

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    CM Fadnavis : डॉक्टर आत्महत्येप्रकरणी CM फडणवीसांनी माजी खासदारांवरील आरोप फेटाळले; रणजितसिंह निंबाळकरांचा काही संबंध नाही

    दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची फलटण मधून ग्वाही!!

    Pankaja Munde : मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही, माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला, पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण