वृत्तसंस्था
मुंबई : गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये २० जागा लढवण्याचा शिवसेनेचा विचार सुरु आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. गोव्यामध्येही महाविकास आघाडीसारखा प्रयोग करण्यासाठी हालचाली सुरु आहेत, असेही त्यांनी सांगितले. Maha Vikas Aghadi to be implemented in Goa too; Shiv Sena MP Sanjay Raut’s explanation
खासदार संजय राऊत म्हणाले की, “गोव्यामध्ये महाविकास आघाडीसारखा प्रयोग करण्याचा विचार सुरु आहे. त्याला कितपत यश येईल हे आताच सांगता येणार नाही, पण त्या संदर्भात हालचाली सुरु आहेत. त्या ठिकाणच्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला चांगलं स्थान मिळालं तर नक्कीच शिवसेना त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकेल.”
उत्तर प्रदेशातील लखनऊ शिवसेना प्रदेश कार्यालयाने ४०३ जागांवर निवडणुका लढण्याचं जाहीर केले होते. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “उत्तर प्रदेशमध्ये देखील ८० ते ९० जागा लढविण्याचा विचार सुरु आहे. काही शेतकरी संघटनांनी सांगितले की तुम्ही निवडणूक लढा, आमचा पाठिंबा आहे. इतर लहान पक्षांना देखील शिवसेनेला पाठिंबा द्यायचा आहे.”
चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भर चौकात जरी थोबाडीत मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही, अशा शब्दांत सरकारमधील मित्र असलेल्या एका वरिष्ठ मंत्र्यांने आपल्याकडे भावना व्यक्त केल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला. चंद्रकांत पाटलांच्या या दाव्यावर संजय राऊत म्हणाले की, “असा हवेत गोळीबार करून चालत नाही. कोणी कोणाच्या थोबाडीत वगैरे मारत नाहीत. चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे आणखी कोणी लोक असतील, ते अशा प्रकारच्या अफवा पसरवत असतात. पण मी वारंवार हेच सांगतो की, हे सरकार पुढील तीन वर्ष देखील उत्तम प्रकारे चालेल आणि त्यानंतर देखील महाविकास आघाडी सत्तेवर येईल.”
Maha Vikas Aghadi to be implemented in Goa too; Shiv Sena MP Sanjay Raut’s explanation
महत्त्वाच्या बातम्या
- अनपेक्षितपणे सत्ता मिळाली! उध्दव ठाकरे यांनी थोबाडीत मारली तरी सरकारमधून बाहेर पडणार नाही, ज्येष्ठ मंत्र्यानेच म्हटल्याचा चंद्रकांत पाटील यांचा पोलखोल
- निवडणुका पुढे ढकलण्याचा आदेश फक्त निवडणूक आयोगाला, ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका
- ऑनलाईन पोर्टल न्यूज लॉँड्री आणि न्यूज क्लिकच्या कार्यालयांवर प्राप्तीकर विभागाचे छापे
- गणेशोत्सवाला प्रतिकूल दिलेले “बड्यांचे” अभिप्राय नंतर लोकमान्यांचे आणि गणेशोत्सवाचे ठरले भूषण…!!