एका मतदारसंघाच्या निवडणुकीने काय फरक पडणार आहे, त्याने काय सरकार बदलणार आहे का? असे अनेकांना वाटत असेल. पण, सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, सरकारला जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाला आहे, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. Leave it to me to change the government, but an opportunity to show the government a place, Devendra Fadnavis warns on Tuesday
विशेष प्रतिनिधी
मंगळवेढा : एका मतदारसंघाच्या निवडणुकीने काय फरक पडणार आहे, त्याने काय सरकार बदलणार आहे का? असे अनेकांना वाटत असेल. पण, सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, सरकारला जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाला आहे, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराच्या सभेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, गेल्या दीड वर्षात महाविकास आघाडी सरकारचे नाव बदलून महावसुली आघाडी झाले आहे. जिथे जाऊ तिथे खाऊ अशी सरकारमधील मंत्र्यांची कामे आहेत.
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आजपर्यंत पाणी देतो म्हणून अनेक भूलथापा देऊन हे निवडून आले होते. पण पाणी काही मिळाले नाही. निवडणूक आली की कोणता तरी बनावट कागद दाखवून फसवणूक करून मते मिळवली आहेत. कोरोना काळात राज्यातील नागरिकांना एकाही रुपयांची मदत ठाकरे सरकारने केली नाही.
जे मुख्यमंत्री बांधावर जाऊन सांगत होते हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळवून देऊ, पण या सरकारने फक्त कवडीमोल मदत केली. सावकारी पद्धतीने वीजबिलाची शेतककडून वसुली केली. लॉकडाऊनच्या काळात जनतेच्या हाताला काम नव्हते, त्यांना दुप्पट बिले देऊन आपली तिजोरी भरली, विजेची थकबाकीच्या नावाखाली यांनी शेतकऱ्यांची वीज कापली. त्यांचे रोहित्र उचलून नेल्याचे पाप यांनी केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
Leave it to me to change the government, but an opportunity to show the government a place, Devendra Fadnavis warns on Tuesday
महत्वाच्या बातम्या वाचा…
- राज्यात लोकशाही नव्हे ‘लॉक’शाही : देवेंद्र फडणवीस पंढरपुरात सहा सभांना केले संबोधित
- कुराणातील २६ वचने काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली ; वासीम रिझवी यांना ५० हजारांचा दंड ठोठावला
- धर्माच्या आधारावर प्रचार करणे ममतांना भोवले; निवडणूक आयोगाची ममतांवर उद्या रात्री ८.०० पर्यंत प्रचारबंदी
- निवडणूक आयोगाने प्रचारबंदी लादल्याच्या निषेधार्थ उद्या ममतांचे कोलकात्यात धरणे आंदोलन
- पंढरपूरात आवताडेंना निवडून आणण्याचा कार्यक्रम करा, मी या सरकारचा “करेक्ट कार्यक्रम” करतो; फडणवीसांची टोलेबाजी