प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाच्या काळात अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या अशा सर्व विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची संधी निर्माण होणार आहे. कारण महाविकास आघाडी सरकारने मेगाभरती करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात लवकरच २ लाख ७५ हजार जागांसाठी मेगाभरती होणार आहे. राज्यात ४२ विभागात तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त असल्याची माहिती आहे.Job News: Recruitment for 2,75000 posts in various departments in Maharashtra soon
किती जागा रिक्त?
- गृहविभाग- ४९ हजार ८५१
- सार्वजनिक आरोग्य विभाग : २३ हजार ८२२
- जलसंपदा विभाग : २१ हजार ४८९
- महसूल आणि वन विभाग : १३ हजार ५५७
- वैद्यकीय शिक्षण विभाग : १३ हजार ४३२
- सार्वजनिक बांधकाम विभाग : ८ हजार १२
- आदिवासी विभाग : ६ हजार ९०७
- सामाजिक न्याय विभाग : ३ हजार ८२१
या जागांवर लवकरच भरती निघणार आहे. लोकसभा, विधानसभेची निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे मागील पाच-सहा वर्षांत रिक्त जागांची भरती होऊ शकली नाही. सध्या सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त झाल्या आहेत.
रिक्त जागा वाढण्याची कारणे
दरवर्षीची सेवानिवृत्त कर्मचारी, पदोन्नती यामुळे बालविकास, सामाजिक न्याय, उच्च व तंत्रशिक्षण, शालेय शिक्षण, कृषी, अन्न आणि नागरी पुरवठा, पशुसंवर्धन या विभागांमधील रिक्त जागा वाढल्या आहेत.
Job News: Recruitment for 2,75000 posts in various departments in Maharashtra soon
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये स्वतंत्र जातीनिहाय जनगणनेस सर्वपक्षीय मंजूरी; केंद्र सरकारची भूमिका काय??
- महिलांच्या अधिकारावर ‘सुप्रीम’ निर्णय : कोर्टाने म्हटले- कुटुंबातील सदस्यांना आवडत नसले तरी स्त्रीला घराबाहेर काढता येणार नाही
- नेत्यांची गळती : जे निराश होते ते निघून गेले, खरे लढणारे काँग्रेसमध्येच!!; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
- सचिन वाझे माफीचा साक्षीदार; अनिल देशमुखांसह किती जणांच्या अडचणी वाढवणार??