विशेष प्रतिनिधी
मुंबई : आरोग्य विभागाच्या परीक्षेबाबत गोंधळामुळे संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. ही परीक्षा पारदर्शीपणे होण्यासाठी ही परीक्षा एमपीएससीमार्फत घ्यावी, अशी सूचना राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी करून आपल्या सरकारला घरचा आहेर दिला आहे.Health department exams Should be taken through MPSC
आरोग्य विभागाचे काम परीक्षेचे काम न्यास या कंपनीला दिले आहे. न्यास ही कंपनी ब्लॅक लिस्ट आहे. तरीही याच कंपनीला काम का देण्यात आले ? असा राज्यातील विद्यार्थ्यांचा सवाल होता. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील अशा कंपनीला काम देण्यात येऊ नये व राज्य सरकारने पारदर्शीपणे घ्यावी,
ही परीक्षा देण्यासाठी सगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी रक्ताचे पाणी करून प्रामाणिकपणे तयारी करतात. त्यामुळे या परीक्षेत घोळ होऊ नये, असे राज्य मंत्री कडू यांनी सांगितलं.
- आरोग्य विभागाच्या परीक्षा MPSC मार्फत घ्याव्यात
- शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचा सरकारला आहेर
- परीक्षा घेणारी न्यास ही कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये
- तिच्या ऐवजी MPSC कडून परीक्षा घेण्याचा आग्रह
- पारदर्शक परीक्षा MPSC कडूनच होईल
- विद्यार्थी सुद्धा अशीच मागणी करत आहेत