विशेष प्रतिनिधी
मुंबई – रामायण मालिकेतील रावणाची भूमिका साकारणारे नामवंत अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने मुंबईमध्ये निधन झाले. त्यांचे वय 83 होते. रामायण या गाजलेल्या मालिकेमुळे ते घराघरात पोहोचले होते.Death of Arvind Trivedi Ravana in Ramayana
सदा हसतमुख असणारे अरविंद भाई एक मनस्वी व्यक्ती होते. टीव्ही मालिकेतील रावणाची भूमिका करताना संवादाद्वारे प्रभू श्री राम आणि सीता माईचा अनवधानाने का होईना पण आपल्याकडून अवमान झाल्याची गोष्ट त्यांना आयुष्याच्या अखेरपर्यंत बोचत होती.
त्यासाठी ते दररोज सकाळी पुजा करताना राम-सीतेची माफी मागत असे सांगितले जाते. या संवेदनशील अभिनेत्याच्या निधनाने अवघी चित्रपटसृष्टी आणि मालिकेचे चाहते शोकाकुल झाले आहेत. त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1938 रोजी झाला होता. मागील अनेक वर्षांपासून ते आजारी होते.
त्यांना तीन वर्षांपासून अधिक त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मुंबईतील कांदिवली परिसरातील घरात मृत्यू झाला.
Death of Arvind Trivedi Ravana in Ramayana
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : रेल्वेने कर्मचाऱ्यांना दिली दिवाळी भेट, 11.56 लाख कर्मचाऱ्यांना मिळतील 78 दिवसांचा बोनस जाहीर
- सुप्रीम कोर्टाने फटाके कंपन्यांना फटकारले, न्यायालय म्हणाले- ‘प्राणांचे मोल देऊन सण साजरा करण्याची परवानगी नाही!’
- वार – पलटवार : राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपकडूनही टीकास्त्र, पात्रा म्हणाले, ‘गांधी कुटुंबाकडून लखीमपूर खीरी शोकांतिकेचा वापर बुडणारे जहाज वाचवण्यासाठी!’
- केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय, ७ मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्यास मंजुरी, लाखो लोकांना रोजगारही मिळणार