• Download App
    छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक धर्मवीर; अजितदादांना संभाजीराजेंनी सुनावले Chhatrapati Sambhaji Maharaj is a swaraj raksha Dharmaveer

    छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक धर्मवीर; अजितदादांना संभाजीराजेंनी सुनावले

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन वादळी स्वरूप आले असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत वादग्रस्त वक्तव्य केले. छत्रपती संभाजी राजे हे स्वराज्य रक्षक होते, धर्मवीर नव्हते, असे म्हटले. त्यावर आता माजी खासदार संभाजी राजे यांनी अजित पवार यांना चुकीचे ठरवले. छत्रपती संभाजी राजे हे स्वराज्य रक्षक होतेच, तसेच ते धर्मवीरही होते. तसे अनेक पुरावे अस्तित्वात आहेत, असे संभाजी राजे पत्रकार परिषदेत अजितदादांना सुनावले आहे. Chhatrapati Sambhaji Maharaj is a swaraj raksha Dharmaveer

    काय म्हणाले संभाजी राजे? 

    छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराराणीसाहेब यांनी या हिंदवी स्वराज्याचे संरक्षण केले. त्याबद्दल दुमत नाही. संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते हे निश्चित आहे. तसेच संभाजी महाराजांनी धर्माचेही रक्षण केले, हे कोणीही नाकारू शकत नाही. म्हणून संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर आहेतच, त्यापाठोपाठ ते धर्मरक्षकही आहेत. हे म्हटले तर काही चुकीचे होणार नाही. त्यामुळे तुम्ही इतिहासाची मोडतोड करू नका, असे संभाजी छत्रपती यांनी सांगितले.



    अजित पवारांनी कोणता संदर्भ देऊन ते विधान केले, ते त्यांनीच सांगावे. कोणत्याही ऐतिहासिक घटनेवर भाष्य करताना त्यावर अभ्यास केल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नका, अशी माझी सर्व पुढाऱ्यांना विनंती राहील, असेही संभाजी राजे म्हणाले. सभागृहात बोललेल्या विधानाला अधिकृतपणा येतो. सभागृहाच्या बाहेर काहीही बोलले जाते, सभागृहात मात्र अभ्यास करूनच बोलावे लागते. मग कोणताही विषय असो, असेही संभाजी राजे म्हणाले.

    Chhatrapati Sambhaji Maharaj is a swaraj raksha Dharmaveer

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Narhari Zhirwal : मंत्री झिरवाळ म्हणाले- लाचखोरीशी माझा संबंध नाही, मंत्रिपदाच्या हव्यासापोटी माझी बदनामी

    Sunetra Pawar : अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा; सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी

    Harshvardhan Sapkal : शिवरायांची टिपूशी तुलना करणाऱ्या सपकाळांचा 72 तासांनी माफीनामा; म्हणाले, शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो