विशेष प्रतिनिधी
पुणे : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केला. यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयामुळे गंभीर पेच निर्माण होणार आहे.Cancel all local body elections till OBC reservation is decided, demands Chandrakant Patil
त्यामुळे आयोगाने ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सर्वच जागांवरील निवडणूक रद्द केली पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे की, ओबीसींच्या आरक्षित जागा वगळून अन्य जागांवरील निवडणूक घेता येईल.
पण न्यायालयाने ही निवडणूक घेतलीच पाहिजे असे म्हटलेले नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या २७ टक्के जागा वगळून ऊर्वरित ७३ टक्के जागांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेऊ नये. अशा निर्णयामुळे केवळ सामाजिकच नाही, तर गंभीर राजकीय पेच निर्माण होत आहे. आयोगाने सर्वच निवडणूक प्रक्रिया रद्द करावी.
पाटील म्हणाले, एखाद्या नगरपंचायतीमधील एकूण १७ जागांपैकी ओबीसी आरक्षित ५ जागांची निवडणूक वगळून ऊर्वरित १२ जागांची निवडणूक घेतली तर त्या १२ नगरसेवकांकडूनच नगराध्यक्ष निवडला जाईल. अर्थात शहरातील ५ वॉडार्तील मतदारांना त्यामध्ये काहीच भूमिका असणार नाही.
एकूण सदस्य संख्येच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी सदस्य उपलब्ध असल्यास अशा प्रकारे नगराध्यक्ष किंवा त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रमुख निवडण्यास कितपत कायदेशीर वैधता राहील याबाबतही शंका आहे.
Cancel all local body elections till OBC reservation is decided, demands Chandrakant Patil
महत्त्वाच्या बातम्या
- अखिलेश यादव हे तर फार मोठे ज्योतिषी!!; काँग्रेसला ० जागा मिळतील या भाकितावरून प्रियांका गांधी यांचा टोला!!
- चिंता वाढली : ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनच्या कम्युनिटी स्प्रेडला सुरुवात, परदेश प्रवास नसणाऱ्यांनाही झाली लागण
- Winter Session : १२ खासदारांच्या निलंबनावर विरोधकांचा पुन्हा गोंधळ, राज्यसभा २ वाजेपर्यंत तहकूब, लोकसभेत राहुल गांधींकडून मृत शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित
- तलवारीने केक कापणे तरुणाच्या अंगलट