• Download App
    बूस्टर डोस हा मोदीजींच्या त्रिसूत्री कोरोनविरोधी लढा नक्कीच बळकट करेल - चंद्रकांत पाटीलBooster dose will definitely strengthen Modiji's fight against three-pronged coron - Chandrakant Patil

    बूस्टर डोस हा मोदीजींच्या त्रिसूत्री कोरोनविरोधी लढा नक्कीच बळकट करेल – चंद्रकांत पाटील

    नागरिकांना सध्या सुरु असलेल्या नाताळ आणि वर्षअखेर या काळात कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आणि जास्तीत जास्त मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.Booster dose will definitely strengthen Modiji’s fight against three-pronged coron – Chandrakant Patil


    विशेष प्रतिनिधी

    नवी-दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला लसीकरणासंदर्भात संबोधित केलं.यावेळी त्यांनी नागरिकांना सध्या सुरु असलेल्या नाताळ आणि वर्षअखेर या काळात कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आणि जास्तीत जास्त मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.दरम्यान यावेळी नरेंद्र मोदी यांनी आज बूस्टर डोसबाबत महत्वाच्या घोषणा देखील केल्या आहेत.

    याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील ट्विट द्वारे म्हणाले की,’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा त्यांची दूरदृष्टी आणि सत्वर निर्णय घेण्याच्या क्षमतेचा प्रत्यय दिला आहे.ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत किशोरवयीन मुला-मुलींचे लसीकरण, आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठांसाठी आणखी एक लस ही मोदीजींची त्रिसूत्री कोरोनाविरोधी लढा नक्कीच बळकट करेल’, असे पाटील म्हणाले आहेत.



    हे आहेत मोदींचे त्रिसूत्र

    १) १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास ३ जानेवारी २०२२ पासून सुरुवात करण्यात येणार .
    २)आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोस १० जानेवारीपासून सुरु होणार .
    ३) ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना सुद्धा बूस्टर डोसचा पर्याय उपलब्ध करण्यात आला असून डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना बूस्टर डोस दिल्या जाणार आहे.

    Booster dose will definitely strengthen Modiji’s fight against three-pronged corona – Chandrakant Patil

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची दुहेरी खेळी; मुंबईत काँग्रेस बरोबर युती, पण उल्हासनगर मध्ये शिंदे सेनेबरोबर आघाडी; भाजपवर मात!!

    समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव; शिक्षण व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक; भैय्याजी जोशींचे परखड मत

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- धर्मच मला व मोदींना चालवत आहे, जोपर्यंत धर्म भारताला मार्गदर्शन करेल, तोपर्यंत देश विश्वगुरू राहील