• Download App
    Aaryan khan Drugs Case: BJP's Manish Bhanushali responds to NCP's Nawab Malik's allegations

    Aaryan khan Drugs Case : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिक यांच्या आरोपांना भाजपच्या मनिष भानुशालींनी दिलं उत्तर

    नवाब मलिक म्हणाले की, मनीष भानुशाली यांचे देवेंद्र फडणवीस, अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो आहेत. मग आता मनिष भानुशाली आणि NCB यांचा काय संबंध आहे हे देखील NCB ला स्पष्ट करावे लागेल.Aaryan khan Drugs Case: BJP’s Manish Bhanushali responds to NCP’s Nawab Malik’s allegations


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : NCB ने क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी केलेली कारवाई बनावट आहे असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक म्हणाले की अरबाझ मर्चंटला जो सोबत घेऊन गेला तो भाजपचा उपाध्यक्ष मनिष भानुशाली आहे. पुढे नवाब मलिक म्हटले की मनीष भानुशाली यांचे देवेंद्र फडणवीस, अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो आहेत. मग आता मनिष भानुशाली आणि NCB यांचा काय संबंध आहे हे देखील NCB ला स्पष्ट करावे लागेल.



    नवाब मलिक यांच्या आरोपावर भानुशाली यांच उत्तर

    नवाब मलिक यांच्या टिकेला उत्तर देताना मनिष भानुशाली म्हणाले की, ‘मला ड्रग्ज पार्टीबद्दल माहिती मिळाली होती. हा ड्रग्जचा विळखा तरूण पिढीला बरबाद करत आहे. या ड्रग्स पार्टी तील लोकं कोण आहे आणि या लोकांना पकडलं पाहिजे म्हणून मी NCB ला ड्रग्स पार्टी संदर्भात माहिती दिली. ड्रग्स पार्टी तील लोकांना पकडलं पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणून मी ही माहिती NCB ला दिली. NCB ने कारवाईचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर कारवाई केली.’

    नवाब मलिक जे आरोप करत आहेत त्यात तथ्य नाही

    ‘मी त्यांना पकडलं नाही. सगळी कारवाई NCB ने केली आहे. मी फक्त NCB अधिकाऱ्यांसोबत चाललो होतो, मला जी माहिती मिळाली होती त्या माहितीची साक्षही नोंदवायची होती म्हणून मी सोबत गेलो होतो. देशहिताचं रक्षण करत काम मी केलं आहे.नवाब मलिक जे आरोप करत आहेत त्यात तथ्य नाही. भाजपमध्ये माझ्याकडे कुठलंही पद नाही. के. पी. गोसावी कोण आहेत तेदेखील मला माहित नाही’ असंही भानुशाली यांनी म्हटलं आहे.

    Aaryan khan Drugs Case: BJP’s Manish Bhanushali responds to NCP’s Nawab Malik’s allegations

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Indians : 2024 मध्ये 2 लाख भारतीय नागरिकत्व सोडले; 2020 पेक्षा हे अडीच पट जास्त; केंद्राने लोकसभेत गेल्या 5 वर्षांचा डेटा दिला

    सब के बॉस तो हम है!!, असे मानणाऱ्यांना भारताचा विकास सहन होत नाही; राजनाथ सिंहांचा ट्रम्प तात्यांना टोला!!

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- जग भारतीय अध्यात्माला महत्त्व देते, अर्थव्यवस्थेला नाही; म्हणूनच आपण विश्वगुरू