गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या केलेल्या भाषणावरून टीका केली होती.Your language and statements are divisive in tribal society; Fadnavis attacked Sharad Pawar
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान मोदींच्या एका व्हिडिओवर शरद पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन फडणवीसांनी पवारांवर ट्विटद्वारे जोरदार निशाणा साधला आहे.यावेळी फडणवीस म्हणाले की , “आदिवासी समाजात फूट पाडणारी तुमची भाषा आणि विधानं आहेत.”
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चार दिवसीय विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या केलेल्या भाषणावरून टीका केली होती.
फडणवीस ट्विट करत म्हणाले, तुमच्यासारख्या मोठ्या नेत्यांना तथ्ये आणि नेमकी माहिती असायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात जनजाती आणि आदिवासी हे शब्द वापरले आहेत. तुम्ही दावा केल्याप्रमाणं त्यांनी शब्द वापरलेले नाहीत.
नेमक काय म्हणाले होते शरद पवार
काल शरद पवारांनी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील कार्यकर्ता आणि पदाधिकारी बैठकीस संबोधित केले. यावेळी बोलताना शरद म्हणाले की, ‘आज देशाची सूत्रे भाजपकडे आहेत. दोन दिवसांपूर्वी भोपाळ येथे आदिवासी संमेलन झाले होते. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते.
पुढे शरद पवार म्हणाले की , पण मला आश्चर्य वाटलं, तिथे कुठेही त्यांनी आदिवासी हा शब्द वापरला नाही. त्याऐवजी वनवासी असा शब्द मोदींनी वापरला. दरम्यान वनवासी हा शब्द आदिवासींना मंजूर नाही. आम्ही मूलनिवासी आहोत, त्यामुळे आम्हाला वनवासी म्हणू नका, असे आदिवासी समाजाचे म्हणणे आहे, असं देखील पवार म्हणाले होते.
Your language and statements are divisive in tribal society; Fadnavis attacked Sharad Pawar
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी