विशेष प्रतिनिधी
मुंबई : हवामान विभागाकडून ३० जुलैपर्यंतच्या पावसाची माहिती देण्यात आली आहे. यात रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. Yellow alert in six dist. of Maharashtra
राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने काही जिल्ह्यात हाहाकार उडाला. नंतर पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे.
पूरग्रस्त जिल्हे रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह पुराच्या फटक्यातून सावरत असलेल्या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ३० जुलैपर्यंतची पावसाची माहिती दिली असून, यात रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर महिन्याच्या शेवटच्या दिवशी रायगड, रत्नागिरी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Yellow alert in six dist. of Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
- सीमावाद चिघळला : आसाम – मिझोराम बॉर्डरवरील संघर्षात 6 जवान शहीद, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची PMOला हस्तक्षेप करण्याची मागणी
- कुरापतखोर चीनसमोर भारतीय सैन्य दलाने उभे केले तोडीस तोड आव्हान; राफेलपासून विविध क्षमतेच्या मिसाईलची सीमेवर तैनाती
- तेलंगणच्या या मंदिराचा यूनेस्कोने जागतिक वारसा स्थळांत केला समावेश, पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून दिल्या शुभेच्छा
- औरंगाबादेत शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांची भाजपच्या गोविंद केंद्रेंना जबर मारहाण, मंत्री भुमरेंच्या कार्यालयात घडला प्रकार