• Download App
    Winning elections does not depend on alliances or fronts; it depends on the strength of workers; Prakash Ambedkar's mantra for the deprived निवडणुका जिंकणे युती किंवा आघाडीवर अवलंबून नाही

    निवडणुका जिंकणे युती किंवा आघाडीवर अवलंबून नाही; ते कार्यकर्त्यांच्या बळावर अवलंबून; प्रकाश आंबेडकरांचा वंचितला मंत्र

    prakash ambedkar

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : महापालिका निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीची कुठल्याही पक्षाशी युती झाली किंवा नाही झाली, तरी स्वतःची हिंमत हरता कामा नये. अनेकांचे सूर निघतात युती झाली नाही, तर आता काय करायचे?? असे म्हणणारे लोकं हे निवडणुकीच्या काळात निराश करण्याचे काम करतात. युती झाली नाही तरी मी जिंकू शकतो, ही मानसिकता आपण निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात केले.Winning elections does not depend on alliances or fronts; it depends on the strength of workers; Prakash Ambedkar’s mantra for the deprived



     

     प्रकाश आंबेडकर म्हणाले :

    – कार्यकर्त्यांनो, तुमचं जिंकण हे युती किंवा आघाडीवर अवलंबून नाही, तर तुमचं जिंकण हे तुमच्या ताकदीवर अवलंबून आहे.

    – युती झाली नाही, तरी आपण जिंकू शकतो ही मानसिकता आपण निर्माण केली पाहिजे.

    – मी माझ्या पक्षाच्या उमेदवाराला जिंकून आणेलच ही मानसिकता निर्माण करा.

    – देशात फक्त धर्माचे राजकारण नाही, तर धर्माच्या नावाखाली पुरोगामी विचार, त्या विचाराच्या लोकांना संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. हे कारस्थान आपल्याला ओळखता आले नाही, तर आपण त्याला बळी पडू.

    Winning elections does not depend on alliances or fronts; it depends on the strength of workers; Prakash Ambedkar’s mantra for the deprived

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, 15 हजार 908 उमेदवार रिंगणात

    ठाकरे बंधूंच्या मराठी अजेंड्यावर सुजात आंबेडकर यांचा जोरदार प्रहार!!

    5 फेब्रुवारी पर्यंत पवार काका – पुतण्यांची एकी; पण केंद्रीय मंत्रिपदासाठी सुप्रिया सुळे यांचे घोडे पुढे दामटले जाताच पुन्हा बेकी!!