विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात विविध विभागात लाखो पदे रिक्त असून मागील पाच सहा वर्षात सरकारी नोकर भरती झालेली नाही. महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने असणारे बेरोजगार तरुण या भरतीची वाट पहात आहेत. विविध विभागातील ही लाखो रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे? असा नाना पटोले यांनी विधानसभेत विचारला. Why not Recruitment of any servant in the State Government in five-six years Question of Nana Patole in the Legislature
नाना पटोले म्हणाले की, दरवर्षी नऊ टक्के कर्मचारी सेवेतून निवृत्त होत असतात. जो रिक्त पदांचा आकडा सांगितलेला आहे, तो कमी आहे. रिक्त पदांची संख्या यापेक्षा जास्त आहे. गेल्या पाच-सहा वर्षात एकही नोकर भरती झालेली नाही. विधानसभेतही कर्मचाऱ्यांचा मोठा बॅकलॉग आहे. कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नसेल तर आपण जनतेला सेवा कशी देणार ?
पटोले म्हणाले की, मागील सरकारच्या काळातही नोकर भरती केली गेली नाही. रिक्त पदांची भरती लवकर होणे गरजेचे आहे. विविध विभागात रिक्त असलेल्या लाखो पदांची भरती करण्यासंदर्भात राज्य सरकारची काय योजना आहे? आणि किती दिवसात नोकर भरती करणार, असे प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला.
राज्यात दोन लाख ३ हजार ३०२ पदे रिक्त आहेत. कोरोनामुळे मागील दोन वर्षात पदभरती झालेली नाही. शासन ही पदभरती करण्याबाबत सकारात्मक असून लवकर पदांची भरती केली जाईल, असे संबंधित मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले.
Why not Recruitment of any servant in the State Government in five-six years Question of Nana Patole in the Legislature
महत्त्वाच्या बातम्या
- निधी वाटपात अन्याय करणाऱ्या राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेनेत “धूर”; संजय राऊतांच्या मात्र केंद्रीय तपास संस्थांविरोधात “तोफा”!!
- महावितरणचा शॉक; लातूरच्या शेतकऱ्यांचा ; ११ एकर ऊस भस्मसात; १५ लाखांचे नुकसान
- चार अटी मान्य करा, लगेच युद्ध थांबवितो; रशियाचा युक्रेनला बैठकीत नवा प्रस्ताव
- औरंगाबादमध्ये महिला दिनानिमित्त क्रांती चौकातून काढलेल्या वाहन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद