• Download App
    शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी। Whole Debt should be forgiven To the farmers; Rayat shetkari sanghatna demanded

    शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी

    विशेष प्रतिनिधी

    नंदुरबार : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली पीक विमा योजना ही फसवी असून पीक विम्याचा फायदा कोणत्याच शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. ही योजना फक्त कागदावर असून या योजनेची माहिती मिळवण्यास गेल्यास बँक अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देतात, अशी माहिती रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहित सोनार यांनी दिली. Whole Debt should be forgiven To the farmers; Rayat shetkari sanghatna demanded

    कोरोनामुळे शेतकरी ,शेतमजूर , व्यापारी मेटाकुटीस आले आहेत. महागाईने तर उच्चांक गाठला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. महागाईचा परिणाम बियाणे व खतांवर देखील झाला आहे. त्यांचे भाव खूप वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. शासनाने बियाणे व खतांचे भाव त्वरित कमी करावे, असे रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहित सोनार यांनी सांगितले.

    • राज्यात महागाईने उच्चांक गाठला
    • शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली
    • शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी
    • बियाणे व खतांचे भाव त्वरित कमी करा
    • रयत शेतकरी संघटनेची मागणी
    • कोरोनामुळे शेतकरी डबघाईला आला

    Whole Debt should be forgiven To the farmers; Rayat shetkari sanghatna demanded

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bihar Maha : महाआघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध; 20 महिन्यांत प्रत्येक घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा

    Jain Muni : जैन बोर्डिंग जमीन व्यवहारात मूळ चूक ट्रस्टींकडूनच, त्यांनी पापांचे प्रायश्चित्त घ्यावे; जैन मुनी गुप्तीनंद महाराज यांची भूमिका

    मुंबई क्लायमेट वीक मध्ये होणार जागतिक वातावरण बदलावर विचार मंथन; इंडियन मेरीटाइम वीक मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबई दौरा