MP Sanjay Raut : मुंबईत काल भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनावर काढलेल्या निषेध मोर्चावेळी शिवसैनिक व भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या घटनेवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राऊत म्हणाले की, शिवसेना भवनावर हल्ला करण्याची हिम्मत कोणाची नाही, काल आलेले लोक कशासाठी आले होते? त्यांचा संबंध काय? शिवसेना भवन महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे, त्यावर चाल करण्याचा प्रयत्न केला तर मराठी माणूस गप्प बसेल का? राऊत पुढे म्हणाले की, ज्यांना लिहिता वाचता येतं त्यांनी तपासून पाहावं. आमचे प्रवक्ते काय बोलले, सामनात काय छापलं ते बघावं. जे आरोप झाले त्यांची चौकशी करा, आरोप बदनाम करण्यासाठी केले असतील त्यावरही कारवाई करा, असे आम्ही म्हणालो. त्यावर मिरच्या का झोंबाव्या? राम मंदिरावर बीजेपीचे कार्यकर्ते आहेत का? खुलासा विचारणे गुन्हा आहे का? ज्यांनी काल प्रयत्न केला त्यांना शिवसैनिकांनी प्रसाद दिला आहे, आता संपूर्ण शिवभोजन थळी द्यायला लावू नका. कोल्हापुरातील मराठा आरक्षण आंदोलनानंतर खा. संभाजीराजेंना मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावलं आहे. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, आज संध्याकाळी भेट आहे , 2 प्रमुख लोक चर्चा करतील, चर्चा व्हायला हवी, चर्चेतूनच प्रश्न सुटतील. ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनावर प्रश्न विचारताच राऊत म्हणाले की, आरक्षण विषय नाजूक झालाय, आरक्षणाबाबतीत एक राष्ट्रीय धोरण केंद्र सरकारला बनवावे लागेल, म्हणून मुख्यमंत्री पंतप्रधान यांना भेटले होते, आता त्यांना निर्णय घ्यावा लागेल. शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवणारे एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी एनआयएने छापे टाकले. यावर प्रश्न विचारताच राऊत म्हणाले की, आम्ही माहिती घेत आहोत. केंद्रीय संस्था सारख्या सारख्या येथे येतात. पोलिसी कारवाई असेल, मला माहिती नाही. यासंदर्भात गृहमंत्री, पोलीस आयुक्त बोलू शकतील, त्या विषयी मला माहीत नाही, मी कसे बोलणार? Watch Shiv Sena MP Sanjay Raut comment On BJP Shiv Sena Clash in Mumbai
महत्त्वाच्या बातम्या
- यामुळे होत नाहीत इंधनाचे दर कमी… करून ठेवलं यूपीएनं, निस्तरतंय मोदी सरकार! वाचा सविस्तर- ऑइल बाँड अन् १.३० लाख कोटींच्या थकबाकीविषयी
- Customized Crash Course : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसोबत लढणार 1 लाख वॉरियर्स ; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केली आणखी एक जबरदस्त मोहीम
- सचिन पायलट आता काँग्रेसचे तरूण नेते नाहीत, तर ज्येष्ठ नेते; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यातून झाला खुलासा
- सातारा जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग; कोयना धरणात ३ टीएमसी पाणी वाढले
- बंगालमध्ये भाजप फाटाफूटीचे आसाममध्ये पडसाद; राहुलजींच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावत काँग्रेसच्या तरूण आमदाराने सोडला पक्ष