• Download App
    राज्यात दोन दिवस मुसळधार; मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा|Warning of heavy rains in Marathwada, North Maharashtra

    राज्यात दोन दिवस मुसळधार; मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    पुणे: राज्याला पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र परिसरात अतिवृष्टीची भीती आहे.गुलाब चक्रीवादळाचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात झाले असून ते दक्षिण ओडिशा व लगतच्या दक्षिण छत्तीसगडवर आहे.Warning of heavy rains in Marathwada, North Maharashtra

    तसेच उत्तर कोकण ते दक्षिण ओडिशा असा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणामी २८ व २९ हे दोन दिवस राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे. गुलाब चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मंगळवारी व बुधवारी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे,



    २८ सप्टेंबर रोजी: धुळे, जळगाव, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यासाठी अतिमुसळधार पावसाचा (२०४.५ मिमीपेक्षा जास्त) रेड अलर्ट तर मुंबई, सिंधुदुर्ग, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा (११५.५ ते २०४.५ मिमीपर्यंत) ऑरेंज अलर्ट.

    तसेच बुलडाणा, वाशीम, अमरावती, अकोला, उस्मानाबाद. लातूर, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (६४.५ ते ११५.५ मिमीपर्यंत पाऊस) जारी करण्यात आला आहे.
    २९ सप्टेंबर : धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर हिंगोली, बीड, परभणी, जालना, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

    Warning of heavy rains in Marathwada, North Maharashtra

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

     

    Related posts

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो; खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का?