• Download App
    विनायक राऊत यांनी माफी मागावी, अन्यथा ‘मातोश्री’ वर मोर्चा; ब्राह्मण समितीचा इशारा।  Vinayak Raut should apologize, otherwise Agitation on ‘Matoshri’; Warning of Brahmin Committee

    विनायक राऊत यांनी माफी मागावी, अन्यथा ‘मातोश्री’ वर मोर्चा; ब्राह्मण समितीचा इशारा

    वृत्तसंस्था

    मुंबई : शिवसेनाचे प्रवक्ते विनायक राऊत यांनी आठ दिवसांत ब्राह्मण समाजाची माफी मागावी अन्यथा ‘मातोश्री’ वर मोर्चा काढू, असा इशारा ब्राह्मण समाज समन्वय समितीने दिला आहे. Vinayak Raut should apologize, otherwise Agitation on ‘Matoshri’; Warning of Brahmin Committee

    “शेंडी-जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही” असे वक्तव्य विनायक राऊत यांनी केल्याने ब्राह्मण समाज समन्वय समितीने त्यावर आक्षेप घेतला आहे. औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत विनायक राऊत यांनी शेंडी जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, असे संतापजनक वक्तव्य करून समस्त ब्राह्मण समाजाचा व हिंदू धर्माचा घोर अपमान केल्याचा आरोप ब्राह्मण समाज समन्वय समितीने केला.



    शिवसेना पक्षातर्फे व शिवसेनेच्या नेत्यांतर्फे असा उल्लेख करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील महाराष्ट्राच्या विधानसभेत जाहीर सभेत तसेच पत्रकार परिषदेमध्ये अनेकदा हे वक्तव्य शिवसेनेच्या नेत्यांतर्फे करण्यात आले आहे, असे ब्राह्मण समाज समन्वय समितीने म्हटलंय.

     Vinayak Raut should apologize, otherwise Agitation on ‘Matoshri’; Warning of Brahmin Committee

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची दुहेरी खेळी; मुंबईत काँग्रेस बरोबर युती, पण उल्हासनगर मध्ये शिंदे सेनेबरोबर आघाडी; भाजपवर मात!!

    समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव; शिक्षण व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक; भैय्याजी जोशींचे परखड मत

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- धर्मच मला व मोदींना चालवत आहे, जोपर्यंत धर्म भारताला मार्गदर्शन करेल, तोपर्यंत देश विश्वगुरू राहील