• Download App
    विजय मल्ल्याचे नउ हजार कोटींचे कर्ज आता बॅंका वसूल करू शकणार।Vijay Mallya gets in trouble

    विजय मल्ल्याचे नउ हजार कोटींचे कर्ज आता बॅंका वसूल करू शकणार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली असलेल्या बँकांच्या संघटना आता व्यावसायिक विजय मल्ल्याकडून ९००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज वसूल करू शकणार आहेत. मुंबईच्या प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग न्यायालयाने बँकांना मोठा दिलासा देत, मल्ल्याची जप्त केलेली संपत्ती बँकांकडे हस्तांतरित करण्याचे आदेश ‘ईडी’ला दिले आहेत. Vijay Mallya gets in trouble

    या आदेशात म्हटले आहे, की ‘ईडी’ने जप्त केलेल्या मल्ल्याच्या मालमत्तेवर स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील १७ बँकांच्या संघटनांचा अधिकार आहे. मल्ल्याच्या जप्त केलेल्या मालमत्तेच्या मालक आता बँका असतील आणि त्यांचे कर्ज वसूल करण्यासाठी या मालमत्तेचा त्या लिलाव करू शकतील.



    मल्ल्याने केलेल्या ९००० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ने १२ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. मल्ल्याच्या जप्त केलेल्या मालमत्तांपैकी काही मालमत्ता या बँकांकडे कर्ज घेण्यासाठी गहाण ठेवण्यात आल्या होत्या. अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केलेल्या मल्ल्याच्या मालमत्तेचा लिलाव करून बँका आता त्यांचे कर्ज वसूल करू शकतील.

    Vijay Mallya gets in trouble

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sunil Tatkare : श्रीकांत शिंदे केंद्रीय शिक्षणमंत्री होणार? खासदार सुनील तटकरेंनी दिले स्पष्टीकरण

    Chhagan Bhujbal : धर्मेंद्र प्रधानांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता; पोलिस लाठीचार्ज अन् देशातील संताप टळला, छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

    Gunratna Sadavarte : ठाकरे हे आपल्या दोन्ही लेकरांच्या प्रमोशनसाठी आले; गुणरत्न सदावर्तेंची तिरंगा रॅलीवर टीका, म्हणाले- घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली