Friday, 9 May 2025
  • Download App
    मुंबईच्या पाच एंट्री पॉईंट्सवरील टोलमध्ये १ ऑक्टोबरपासून १२.५ ते १८.७५ टक्के होणार वाढ Toll at five entry points of Mumbai will increase from 12.5 to 18.75 percent from October 1

    मुंबईच्या पाच एंट्री पॉईंट्सवरील टोलमध्ये १ ऑक्टोबरपासून १२.५ ते १८.७५ टक्के होणार वाढ

    दर तीन वर्षांनी टोलची पुनरावृत्ती होत असते

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :  मुंबईच्या पाच एंट्री पॉईंट्सवरील टोलच्या दरात १ ऑक्टोबरपासून १२.५ ते १८.७५ टक्के वाढ होणार आहे.  दहिसर, एलबीएस रोड-मुलुंड, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे-मुलुंड, ऐरोली खाडी पूल आणि वाशी हे मुंबईचे पाच एंट्री पॉईंट्स  आहेत. Toll at five entry points of Mumbai will increase from 12.5 to 18.75 percent from October 1

    सुधारित दरानुसार  मिनी बससाठीच्या टोलच्या दरात १० रुपयांनी वाढ होणार आहे, सध्या मिनी बससाठी ६५ ते ७५ रुपये टोल आकारला जातो.  तर प्रवासी  कार, हलकी मोटार वाहनांच्या  एकेरी टोल दरात ५ रुपयांची वाढ  होईल. याशिवाय ट्रक आणि बससारख्या अवजड वाहनांना आता १५० रुपये मोजावे लागणार आहेत. तर मल्टी एक्सल वाहनांसाठी १९० रुपये आकारले जाणार आहेत.

    सप्टेंबर २००२ पासून मुंबईच्या या एंट्री पॉईंट्सवर टोल आकारला जात असून आता हे शुल्क नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू असणार आहे. दर तीन वर्षांनी टोलची पुनरावृत्ती होत असते, या अगोदर १ ऑक्टबर २०२० रोजी ती झाली होती, त्यामुळे आता पुन्हा १ ऑक्टोबर रोजी पुनरावृत्ती होत आहे. तर पुढे १ ऑक्टोबर २०२६ रोजी होईल.

    Toll at five entry points of Mumbai will increase from 12.5 to 18.75 percent from October 1

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Devendra Fadnavis : महाराष्ट्र शासन अन् विधि सेंटर फॉर लिगल पॉलिसी यांच्यात सामंजस्य करार

    Akhand Bharat : नागपूरच्या झिरो माईल येथे ‘अखंड भारत एक्सपिरियन्स सेंटर’सह अनेक प्रकल्पांना मंजुरी

    Finance Commission : वित्त आयोगाकडून महाराष्ट्राच्या आर्थिक शिस्तीचे कौतुक