• Download App
    ही दिवाळी 'आत्मनिर्भर'वाली : चिनी निर्यातीला ५० हजार कोटींचे नुकसान होणार, स्वदेशी उद्योगांना सुगीचे दिवस । This Diwali India Aatmanirbhar Chinese exports Likely To Loss of 50 Thousand crore Rupees

    ही दिवाळी ‘आत्मनिर्भर’वाली : चिनी निर्यातीला ५० हजार कोटींचे नुकसान होणार, स्वदेशी उद्योगांना सुगीचे दिवस

    दिवाळी आणि इतर सणांच्या आधी चिनी वस्तूंचे भारतात मोठे नुकसान होणार आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने म्हटले आहे की, भारतीयांनी देशांतर्गत बाजारपेठेत चीनमधील उत्पादनांवर बहिष्कार टाकल्यामुळे यावर्षी चिनी निर्यातदारांचे अंदाजे 50,000 कोटींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. This Diwali India Aatmanirbhar Chinese exports Likely To Loss of 50 Thousand crore Rupees


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : दिवाळी आणि इतर सणांच्या आधी चिनी वस्तूंचे भारतात मोठे नुकसान होणार आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने म्हटले आहे की, भारतीयांनी देशांतर्गत बाजारपेठेत चीनमधील उत्पादनांवर बहिष्कार टाकल्यामुळे यावर्षी चिनी निर्यातदारांचे अंदाजे 50,000 कोटींचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

    या हंगामात भारतीयांनी चीनमधून फटाके आणि इतर स्वस्त सणाच्या उत्पादनांवर बंदी घातली आहे, याचा थेट फायदा भारताच्या स्वदेशी उद्योगांना नफ्याच्या रूपात होणार आहे. शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात, व्यापार्‍यांच्या संघटनेने म्हटले आहे की, सणासुदीच्या आधी देशभरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची संख्या वाढल्याने भारताच्या देशांतर्गत विक्रीला या दिवाळीत मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. दिवाळीच्या विक्रीदरम्यान ग्राहकांच्या खर्चाद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी रुपयांचा ओघ दिसू शकतो.



    “मागील वर्षीप्रमाणे, या वर्षीदेखील CAIT ने ‘चिनी वस्तूंवर बहिष्कार टाका’ अशी हाक दिली आहे आणि हे निश्चित आहे की, भारतीय व्यापार्‍यांनी चिनी वस्तूंची आयात बंद केल्यामुळे चीनला सुमारे 50,000 कोटींचे व्यावसायिक नुकसान होणार आहे.” CAIT ने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात हे म्हटले आहे.

    ‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, आणखी एक महत्त्वाचा बदल अलीकडेच दिसून आला तो म्हणजे देशातील प्रमुख शहरांमधील ग्राहकांना चिनी उत्पादने खरेदी करण्यात खरोखरच रस दिसत नाही, ज्यामुळे भारतीय वस्तूंची मागणी वाढण्याची शक्यता आहे. सीएआयटीचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, संस्थेच्या संशोधन शाखेने 20 ‘वितरण शहरां’मध्ये (नवी दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, नागपूर जयपूर, लखनौ, चंदीगड, रायपूर, भुवनेश्वर, कोलकाता, रांची, गुवाहाटी, पाटणा, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, मदुराई, पाँडेचेरी, भोपाळ आणि जम्मू) केलेल्या नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, आतापर्यंत भारतीय व्यापारी किंवा आयातदारांकडून चिनी निर्यातदारांना दिवाळीच्या वस्तू, फटाके किंवा इतर वस्तूंची ऑर्डर देण्यात आलेली नाही.

    This Diwali India Aatmanirbhar Chinese exports Likely To Loss of 50 Thousand crore Rupees

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!