• Download App
    कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत, मुंबईतील पंचतारांकित हॉटेल हयात रिजेन्सी झाले बंद|There is no money to pay the salaries of the employees, the five star hotel Hyatt Regency in Mumbai is closed

    कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत, मुंबईतील पंचतारांकित हॉटेल हयात रिजेन्सी झाले बंद

    कर्मचाऱ्यांचे पैसे द्यायलाही पगार नसल्याने पुढील आदेशापर्यंत मुंबईतील पंचतारांकित हॉटेल हयात रिजेन्सी बंद राहणार आहे. पुरेसा पैसा नसल्याने तसेच या हॉटेलचा सद्य स्थितीत व्यवसाय नसल्याने होत नसल्याने येथील कर्मचाऱ्यांचे पगार देऊ शकत नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे अशियन हॉटेल्स (वेस्ट) लि. या कंपनीने म्हटले आहे.There is no money to pay the salaries of the employees, the five star hotel Hyatt Regency in Mumbai is closed


    प्रतिनिधी

    मुंबई : कर्मचाऱ्यांचे पैसे द्यायलाही पगार नसल्याने पुढील आदेशापर्यंत मुंबईतील पंचतारांकित हॉटेल हयात रिजेन्सी बंद राहणार आहे. पुरेसा पैसा नसल्याने तसेच या हॉटेलचा सद्य स्थितीत व्यवसाय नसल्याने होत नसल्याने येथील कर्मचाऱ्यांचे पगार देऊ शकत नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे अशियन हॉटेल्स (वेस्ट) लि. या कंपनीने म्हटले आहे.

    हयात रिजेन्सी ही अमेरिकन हॉस्पिटॅलिटी कंपनी आहे. याची मुंबईतील प्रॉपर्टी हयात रिजन्सी ही अशियन हॉटेल्स (वेस्ट) लि.च्या अंतर्गत चालविण्यात येत आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ हे हॉटेल आहे.



     

    पुढील आदेशापर्यंत हॉटेल बंद असल्याकारणाने येथे कुठल्याही प्रकारचे बुकिंग स्विकारले जाणार नाही. तसेच गेल्या वषीर्पासून येथे येणा-या ग्राहकांची संख्या रोडावल्याने या हॉटेलचा फारसा व्यवसाय होत नव्हता.

    परिणामी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही कंपनीकडे पुरेसा पैसा नसल्याने हे हॉटेल तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे असे हॉटेल व्यवस्थापन अधिका-यांनी सांगितले आहे. हॉटेल एकाएकी बंद झाल्याने येथील काम करणारे कर्मचारी बेरोजगार होणार असल्याने कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला आहे.

    There is no money to pay the salaries of the employees, the five star hotel Hyatt Regency in Mumbai is closed

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस