• Download App
    'जलयुक्त शिवार'चे यश! जलसंवर्धनात आपला महाराष्ट्र देशात अव्वल The success of Jalyukta Shivar The reaction of Devendra Fadnavis who is top in Maharashtra in water conservation

    ‘जलयुक्त शिवार’चे यश! जलसंवर्धनात आपला महाराष्ट्र देशात अव्वल

    (संग्रहित छायाचित्र)

    जाणून घ्या, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय दिली प्रतिक्रिया?

     विशेष प्रतिनिधी

    मुंबई : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे.  यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘’जलयुक्त शिवार’चे यश! जलसंवर्धनात आपला महाराष्ट्र पहिला!! केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात आपल्या महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे, हे सांगताना मला अत्यानंद होतो.’’ अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. The success of Jalyukta Shivar The reaction of Devendra Fadnavis who is top in Maharashtra in water conservation

    याचबरोबर  ‘’जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे आदी योजना एकत्रितपणे राबविल्याचे हे यश आहे. अन्य राज्यात तळी आणि जलसाठे अधिक असली तरी जलसंवर्धनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे.’’

    याशिवाय ‘’2018-19 या वर्षात ही गणना करण्यात आली. या अहवालातील महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे बहुसंख्य जलसाठे हे जलसंवर्धन योजनांमधील आहेत. जलयुक्त शिवार आणि अन्य जलसंवर्धनाच्या योजनांना लोकचळवळ बनविणार्‍या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, सामाजिक संघटनांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो. हे आपल्या सर्वांचे सामूहिक यश आहे. आता असेच आपले सहकार्य जलयुक्त शिवार 2.0 मध्येही अपेक्षित आहे.’’ असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

    The success of Jalyukta Shivar The reaction of Devendra Fadnavis who is top in Maharashtra in water conservation

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Sunil Tatkare : श्रीकांत शिंदे केंद्रीय शिक्षणमंत्री होणार? खासदार सुनील तटकरेंनी दिले स्पष्टीकरण

    Chhagan Bhujbal : धर्मेंद्र प्रधानांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता; पोलिस लाठीचार्ज अन् देशातील संताप टळला, छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

    Gunratna Sadavarte : ठाकरे हे आपल्या दोन्ही लेकरांच्या प्रमोशनसाठी आले; गुणरत्न सदावर्तेंची तिरंगा रॅलीवर टीका, म्हणाले- घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली