• Download App
    जितेंद्र आव्हाड प्रकरणी भाजप अध्यात्मिक आघाडी आक्रमक; आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। The spiritual lead of BJP is aggressive : Asked the government to file a crime against Jitendra Avhad for prayer in Temple

    जितेंद्र आव्हाड प्रकरणी भाजप अध्यात्मिक आघाडी आक्रमक; आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : ठाकरे सरकारने कोरोना काळात मंदिरांना टाळे ठोकले आहेत. गेली दीड वर्षे मंदिरात प्रवेश बंदी केली असताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नियम तोडून नुकतीच पूजा केली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी केली. जितेंद्र आव्हाड यांच्यांवर अद्यापि गुन्हा का दाखल झाला नाही?,असा सवाल त्यांनी केला आहे. The spiritual lead of BJP is aggressive : Asked the government to file a crime against Jitendra Avhad for prayer in Temple

    या मुद्यावर आवाज उठविणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. महाराष्ट्र कायद्याचे राज्य असताना जनता आणि मंत्री यांना स्वतंत्र न्याय कसा ? असा प्रश्न भोसले यांनी विचारला आहे. या प्रश्नी आता पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहे. गुन्हा दाखल झाला नाहीतर धरणे आंदोलन करणार आहे.

    • जितेंद्र आव्हाड यांची नियम तोडून पूजा
    • जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा का नाही ?
    • ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना वेगळा न्याय आहे का ?
    • भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे सवाल
    • आवाज उठविणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे
    • जनता आणि मंत्री यांना स्वतंत्र न्याय कसा ?
    • पोलिस आयुक्तांची भेट घेणार
    • गुन्हा दाखल नाही केला तर आंदोलनाचा इशारा

      The spiritual lead of BJP is aggressive : Asked the government to file a crime against Jitendra Avhad for prayer in Temple

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो; खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का?