वृत्तसंस्था
मुंबई : उत्तर भारतातील अनेक राज्ये उष्णतेने होरपळत आहेत. आता महाराष्ट्रालाही लाटांचे चटके बसत असून पाऱ्याने उसळी घेतली आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिली. शिवाय पश्चिमी हिमालय क्षेत्र, गुजरातमधील काही भाग, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहार, झारखंड या राज्यांना उष्णतेच्या लाटेचा फटका बसेल, असेही सांगितले. The heat waves ruled in North india; increasing more in 5 days
कोकणात पावसाचे शिंतोडे
गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली आहे.
कोणत्या जिल्ह्यांना लाटेचा फटका बसणार
बुलडाणा, अकोला, जळगाव, हिंगोली, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, यवतमाळ, अमरावती.
The heat waves ruled in North india; increasing more in 5 days
महत्त्वाच्या बातम्या
- Hindu Minorities : काही राज्यांत हिंदूंना देखील अल्पसंख्यांक दर्जा आणि अधिकार द्यावा; केंद्राचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र!!
- देशातील १० राज्यांत हिंदूच अल्पंसख्यांक, केंद्र सरकाची अल्पसंख्यांकांचा दर्जा शिफारस
- President Mayawati?? : मायावतींना राष्ट्रपतीपदाची ऑफर??; मायावतींनीच फेटाळली शक्यता!!
- Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बख्तियारपूरमध्ये मारहाण; युवक पोलिसांच्या ताब्यात
- एसटी कर्मचाऱ्यांपाठोपाठ महाराष्ट्रातील वीज कर्मचारी भडकले; आज मध्यरात्रीपासून संपावर!!
- महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पारा 40 अंश सेल्सिअसवर