• Download App
    Suresh Dhas सुरेश धस यांचा आरोप, धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना

    Suresh Dhas : सुरेश धस यांचा आरोप, धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना 300 कोटींचा ‎घोटाळा, वाल्मीकनेच ठरवल्या निविदा!

    Suresh Dhas

    प्रतिनिधी

    बीड : Suresh Dhas राज्याचे तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या‎‎कार्यकाळात कृषी खात्यात ३०० कोटी‎‎रुपयांचा घोटाळा झाला आहे.‎‎वाल्मीक कराडने निविदा ठरवल्या,‎‎महाराष्ट्रात एजंट नेमले, असा आरोप‎‎भाजप आमदार सुरेश धस यांनी‎‎केला. गुरुवारी आष्टीत त्यांनी‎पत्रपरिषद घेतली. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचा‎अधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे.‎सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर अजित पवार यांनी‎स्वतः राजीनामा दिला होता. मग धनंजय मुंडे का देत‎नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.‎Suresh Dhas

    आमदार धस म्हणाले, शेतकरी किंवा क्षेत्रीय‎अधिकाऱ्यांची मागणी नसताना धनंजय मुंडे यांनी‎खरेदीचा निर्णय घेतला. एकाच दिवशी प्रस्ताव पाठवला‎आणि त्याच दिवशी शासन निर्णय (जीआर) निघाला.‎कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे निविष्ठा खरेदीत बदल‎केला. नॅनो युरिया खरेदीत २१ कोटी २६ लाखांचा घोटाळा‎करण्यात आलेला आहे, असे धस यांनी सांगितले.‎



    भारतीय किसान संघाने मुख्यमंत्री‎देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या‎घोटाळ्याची चौकशी करण्याची‎मागणी केली होती. मात्र, वाल्मीक‎कराड यांनी हे पत्र फाडून टाकल्याचा‎आरोप आमदार धस यांनी केला.‎कृषी विभागाला आव्हान देतो, हे पत्र‎तुमच्याकडे आहे का, असा सवाल‎धस यांनी केला. मुख्यमंत्री‎फडणवीस यांनी याचे उत्तर द्यावे,‎अशी मागणी केली. धनंजय मुंडे‎यांनी केलेल्या बदल्यांमध्ये १००‎कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर‎आरोप त्यांनी केला. बदल्यांसाठीचे‎रेट कार्ड त्यांच्या सहकाऱ्यांकडे‎सापडले. या बदल्यांमधून मिळणारा‎पैसा थेट धनंजय मुंडे यांच्याकडे‎जात होता, असा दावा त्यांनी केला.‎

    खटला दाखल करा, धस यांचे मुंडे यांना आव्हान‎

    राज्यात ठराविक एजंटांची नेमणूक‎करण्यात आली होती. या सर्वांचे‎कॉल डिटेल्स तपासा. १०० कोटींपेक्षा‎अधिकचा भ्रष्टाचार यात आहे.‎वाल्मीक कराड याने निविदा‎ठरवल्या. गैरव्यवहार केवळ‎बीडपुरता नव्हता, तर संपूर्ण‎महाराष्ट्रभर पसरलेला होता. आता‎कागदाचा लढा सुरू झाला आहे,‎खटला दाखल झाला तरी मी माघार‎घेणार नाही, असे धस म्हणाले.‎धनंजय मुंडे यांनी अंजली‎दमानियांऐवजी माझ्यावर खटला‎दाखल करावा, असे आव्हान दिले.‎

    मंत्री मुंडे राजीनामा का देत नाहीत, आ. धसांचा सवाल ‎

    धनंजय मुंडे यांनी आता अर्ज आणि‎लगेच कर्ज या पद्धतीने सर्व प्रक्रिया‎केली. टेंडर अतिशय नियोजनबद्ध‎पद्धतीने काढले. कुणालाही संशय‎येऊ नये याची काळजी घेतली. नॅनो‎युरियामध्ये २१ कोटी २६ लाख,‎डीएपीमध्ये ५६ कोटी ७६ लाख,‎बॅटरी खरेदीत ४५ कोटी ५३ लाख‎आणि कापूस साठवणुकीची ५७७‎रुपयांची बॅग १,२५० रुपयांना खरेदी‎करण्यात आली. एकूण १८० कोटी ८३‎लाख रुपये धनंजय मुंडे आणि‎त्यांच्या टीमने बाहेर काढल्याचा‎आरोप आमदार धस यांनी केला.‎रफिक नाईकवाडे हे या‎घोटाळ्यातील सूत्रधार असून, भामरे‎हे आजही त्यांच्यासोबत आहेत,‎असा दावा धस यांनी केला.‎

    Suresh Dhas alleges that there was a scam of Rs 300 crore when Dhananjay Munde was the Agriculture Minister, Valmik himself decided the tenders!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करायचा निर्धार!!

    पुरोहित संघातील 38 वर्षांची मक्तेदारी संपली, अध्यक्ष पदावरून सतीश शुक्लांची हकालपट्टी; चंद्रशेखर पंचाक्षरींकडे जबाबदारी; आता गोदावरी आरतीचा वाद संपण्याची अपेक्षा!!

    MNS-Thackeray : मनसे – ठाकरे गट युतीबाबत अमित ठाकरे यांचे सूचक वक्तव्य :दोन भावांनी बोललं पाहिजे, आम्ही बोलून काही फरक पडणार नाही