प्रवाशांचे लसीकरण प्रमाणपत्र अनेक राज्यांमध्ये प्रवेशासाठी अनिवार्य अट करण्यात आले आहे. राज्यातील सर्व विमानतळांवर प्रवाशांचे लस प्रमाणपत्र देखील तपासले जात आहेत. पण वारंवार होणाऱ्या या प्रकाराला कंटाळून कॉमेडियन अतुल खत्रीने भन्नाट आयडिया आणली आहे.Standup comedian Atul Khatri prints Corona vaccine certificate on his T-shirt, you will also laugh after knowing the reason
विशेष प्रतिनिधी
मुंबई : वर्षापेक्षाही जास्त काळापासून देश कोरोना विषाणूच्या महामारीशी लढत आहे. पहिल्या लाटेत लाखो लोकांनी आपला जीव गमावला नाही. लस आल्यानंतर देशाला दुसऱ्या लाटेलाही सामोरे जावे लागले आणि अजूनही तिसऱ्या लाटेचा धोका आहे. मात्र, लसीकरणाचे काम जोरात सुरू आहे.
दरम्यान, अनेक राज्यांमध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले जाते आणि तेथे अनेक सूट देण्यात आल्या आहेत.प्रवाशांचे लसीकरण प्रमाणपत्र अनेक राज्यांमध्ये प्रवेशासाठी अनिवार्य अट करण्यात आले आहे. राज्यातील सर्व विमानतळांवर प्रवाशांचे लस प्रमाणपत्र देखील तपासले जात आहेत. पण प्रवासी कुठे दाखवणार त्याचे प्रमाणपत्र. प्रमाणपत्र दाखवण्यासाठी त्याला आपला मोबाईल वारंवार दाखवावा लागेल.
ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत, त्यांना त्यांचे छापील प्रमाणपत्र दाखवावे लागेल. हे सर्व बघून स्टॅण्डअप कॉमेडियन अतुल खत्री यांनी विनोदी पद्धतीने हा नियम पाळायचं ठरवलं आहे. अतुल खत्री यांचे कृत्य तुमच्या चेहऱ्यावर हसू आणू शकते. अतुल खत्री यांनी स्वत:च्या टी-शर्टवरच कोरोना लसीचे प्रमाणपत्र छापून घेतले आहे.
अतुल खत्रीने असा टी-शर्ट घातलेला एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. हे चित्र शेअर करताना अतुलने लिहिले, “जेव्हापासून काम आणि प्रवास सुरू झाला आहे आणि मी विमानतळ, हॉटेल आणि इतर ठिकाणी माझे कोविड प्रमाणपत्र दाखवून- दाखवून थकलो आहे. यातूनच मला ही कल्पना आली. क्या आयडिया है सरजी!”
Standup comedian Atul Khatri prints Corona vaccine certificate on his T-shirt, you will also laugh after knowing the reason
महत्त्वाच्या बातम्या
- लालूंच्या दोन मुलांमध्ये भाऊबंदकीची ठिणगी, एकमेंकांच्या फोटोंना काळे फासू लागले राष्ट्रीय जनता दल फुटीच्या उंबरठ्यावर
- अमरसिंह यांच्या सांगण्यावरून मुलायम सिंह यादव यांनी अखिलेश यादव यांच्याकडे सोपवली पक्षाची सूत्रे, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्याही पाया पडू नका असा चाणक्यांनी दिला होता मंत्र
- उत्तर प्रदेशात १९ हिंदूंना शुध्दीकरण करून पुन्हा घेतले हिंदू धर्मात, बंजारा बांधवांचे झाले होते जबरदस्तीने धर्मांतर
- पारदर्शकतेची कमाई, भाजपाला इलेक्ट्रोरेल बॉँडच्या माध्यामतून मिळाली २,५५५ कोटी रुपयांची देणगी