प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांनी जो विजयाचा दावा केला आहे, तो खोटा असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. Shinde group – BJP’s claim of victory is false pawar statement
प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसला 173 ग्रामपंचायतींमध्ये, तर काँग्रेसला 84 ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले असून एकूण 285 ग्रामपंचायत या दोन्ही पक्षांनी मिळून जिंकल्या आहेत. तर शिंदे गट आणि भाजपला 210 ग्रामपंचायतीं मध्ये यश मिळाले आहे, असा दावा शरद पवारांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय चिन्हावर लढविल्या जात नाहीत हजारो गावांमध्ये विविध पक्ष गट, अपक्ष, सर्वपक्षीय पॅनल अशा स्वरूपाने निवडणुका लढवल्या जातात. परंतु, निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत असतात. यावेळची ग्रामपंचायत निवडणूक सदस्यांबरोबर सरपंचांची मतदारांमधून थेट निवडणूक या स्वरूपात झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सरपंचांनी आपण कोणत्या पक्षाचे आहोत हे जाहीर केले की निकाल अधिक स्पष्ट होणार आहे.
या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजपने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर विजय मिळवल्याचे म्हटले आहे, तर शरद पवारांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाधिक ग्रामपंचायतीवर निवडून आल्याचा दावा केला आहे. पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेत त्यांच्यावरच्या पत्राचाळ घोटाळ्याच्या आरोपापासून ते ग्रामपंचायत निवडणुकीपर्यंत सविस्तर भाष्य केले आहे.
Shinde group – BJP’s claim of victory is false pawar statement
महत्वाच्या बातम्या
- श्रीनगरमध्ये तब्बल 30 वर्षा नंतर सिल्वर स्क्रीनवर आला सिनेमा; मल्टिप्लेक्सचा शुभारंभ!!
- महाराष्ट्रात आता वाघांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणार स्थानांतर, हे आहे कारण
- द फोकस एक्सप्लेनर : ज्या हिजाबच्या वादात धुमसत आहे इराण, जाणून घ्या काय आहे त्याचा इतिहास, कशी सुरुवात झाली?
- महापौर या शब्दाची भेट स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला दिली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस