• Download App
    Sharad Pawar महाराष्ट्राचा "नेपाळ" करणे पवारांसारख्या घराणेशाही चालाविणाऱ्या नेत्यांना परवडेल का??

    Sharad Pawar महाराष्ट्राचा “नेपाळ” करणे पवारांसारख्या घराणेशाही चालाविणाऱ्या नेत्यांना परवडेल का??

    महाराष्ट्राचा “नेपाळ” करणे पवारांसारख्या घराणेशाही चालाविणाऱ्या नेत्यांना परवडेल का??, असे विचारायची वेळ खुद्द शरद पवारांच्याच इशाऱ्यामुळे आली आहे. काल नाशिक मध्ये शेतकरी आक्रोश मोर्चात केलेल्या भाषणात पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून नेपाळची आठवण करून दिली. Sharad Pawar

    देश चालविणारे आणि राज्य चालविणारे नेते लोकांच्या, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देत नाहीत. आपल्या शेजारच्या नेपाळमध्ये काय घडले याच्या खोलात मी जात नाही. पण देवाभाऊंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नेपाळ मधल्या परिस्थितीतून धडा घ्यावा, असा इशारा पवारांनी दिला. मुद्दा ओल्या दुष्काळाचा आणि शेतकरी कर्जमाफीचा होता, पण शरद पवारांनी “स्वप्न” महाराष्ट्राचा “नेपाळ” करायचे पाहिले!!

    राज्यात गेल्या दोन-तीन महिन्यात पडलेल्या तुफान पावसामुळे ओला दुष्काळ पडलाय. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मोर्चेकर्‍यांची मुख्य मागणी होती. त्यानुसार शरद पवारांच्या सकट सगळ्या नेत्यांनी ही मागणी उचलून धरली पण त्यापलीकडे जाऊन स्वतः शरद पवारांनी राष्ट्रवादीला महाराष्ट्राचा “नेपाळ” करायचाय, हे स्वप्न जाहीररित्या सांगितले. किंबहुना हे राजकीय सत्य त्यांच्या तोंडून आपसूक बाहेर पडले.

    – सगळी हत्यारे ठरली बोथट

    मुद्दा कोणताही असो, महाराष्ट्रातले प्रचंड बहुमतवाले सरकार स्थिरपणे काम करू द्यायचे नाही. हे सरकार टिकू द्यायचे नाही, असा चंग सगळ्याच विरोधकांनी बांधलाय. त्यासाठी वोट चोरीपासून आरक्षणापर्यंतच्या सगळ्या राजकीय आणि सामाजिक हत्यारांचा वापर करून झालाय. पण महाराष्ट्रातले प्रचंड बहुमतवाले स्थिर सरकार हलविण्यात विरोधकांना जराही यश आले नाही. अगदी मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरच्या आंदोलनातून सुद्धा फडणवीस सरकारचे काही वाकडे झाले नाही. किंबहुना हायकोर्टाच्या रेट्यामुळे पाच दिवसांमध्ये आंदोलन गुंडाळावे लागले. त्यामुळे शरद पवारांना मनोज जरांगे यांची राजकीय किंमत कवडी सारखी करावीशी वाटली. जरांगेंच्या आंदोलनाशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपला स्वतःचा कवडीचाही संबंध नाही, असे त्यांना पत्रकार परिषदेत सांगावे लागले. राज्यातले सरकार घालविण्यात अपयश आल्याची ती कबुली होती.



    – पवारांचा इशारा

    पण नाशिक मधल्या आजच्या शेतकरी मोर्चात शरद पवारांनी देवाभाऊंना महाराष्ट्रात “नेपाळ” घडायचा इशारा दिला. आपल्या शेजारच्या नेपाळमध्ये काय घडले, याच्या खोलात मी जात नाही. तिथल्या राज्यकर्त्यांना कुठल्या परिस्थितीत घरी जावे लागले, हे सगळ्यांना माहिती आहे. देवाभाऊ त्यांचे सहकारी नेपाळच्या घटनांमधून धडा घेतील, असे शरद पवार म्हणाले. यातूनच त्यांच्यात मुखातून महाराष्ट्रात “नेपाळ” घडवायचे स्वप्न बाहेर आले.

    नेपाळचा संदर्भ, पण तो अर्धवट

    नेपाळमध्ये युवकांच्या आंदोलनाने तिथले माओवाद्यांचे सरकार घालविले. युवकांनी दोन दिवस जाळपोळी केल्या. पण नंतर तिथले युवक नेपाळच्या साफसफाईला देखील बाहेर पडले. जाळपोळीच्या घटनांबद्दल युवकांनी दिलगिरी व्यक्त केली. नेपाळमध्ये दोन दिवसांमध्ये शांतता निर्माण झाली. युवकांनी सामंजस्याने तिथल्या प्रश्न सोडविला. सुशीला कार्की यांच्यासारख्या सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना पंतप्रधानपदी बसवून त्यांना सहकार्य करायचे मान्य केले. परंतु, शरद पवारांनी नेपाळचा संदर्भ फक्त जाळपोळी पुरता दिला. महाराष्ट्रात “नेपाळ” घडायचा इशारा दिला. पण याचा अर्थ पवारांनी नेपाळचा संदर्भ अर्धाच दिला. तो पूर्ण दिलाच नाही.

    – सहा माजी पंतप्रधान निवृत्त

    कारण नेपाळमध्ये युवकांनी घराणेशाही चालवणाऱ्या राज्यकर्त्यांचा राजीनामा घेतला. ते तेवढ्याच पुरते थांबले नाहीत, तर त्यांनी नेपाळ मधल्या सहा माजी पंतप्रधानांचा राजकीय निवृत्तीचा निर्णय लेखी लिहून घेतला. त्यांना तो निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर करायला लावला. त्यानंतरच युवकांनी नेपाळ मधले आंदोलन थांबविले.

    – पवारांना खरंच निवृत्त व्हावे लागेल

    महाराष्ट्रात असा “नेपाळ” घडविणे शरद पवार यांच्यासारख्या घराणेशाही चालवणाऱ्या नेत्यांना परवडेल का??, हा खरा सवाल आहे. ज्या देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून शरद पवारांनी नेपाळ घडवायचा इशारा दिला, त्या फडणवीस यांचे कुणीही सध्या महाराष्ट्राच्याच काय, पण राजकारणात नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा “नेपाळ” झाला, तर एकट्या फडणवीसांना जावे लागेल, पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या युवकांनी नेपाळचाच आदर्श घ्यायचे ठरविले, तर स्वतःच्या आत्मचरित्र प्रकाशनात जाहीर केलेली निवृत्ती शरद पवारांना खऱ्या अर्थाने घ्यावी लागेल. त्याचबरोबर त्यांनी लादलेली घराणेशाही कायमची घरी बसावी लागेल. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या 90 % पुढाऱ्यांचे राजीनामे आणि निवृत्तीपत्रे लिहून घ्यावे लागतील. त्यांच्याबरोबर काँग्रेस + शिवसेना + भाजप या पक्षांमधल्या नेत्यांनाही त्याच वाटेने जावे लागेल. महाराष्ट्राचा “नेपाळ” झाला, तर पवारांना आपल्या स्वप्नातली महिला मुख्यमंत्री सुद्धा करणे कायमचे रद्द करावे लागेल. तेव्हा महाराष्ट्राचा “नेपाळ” करायचा देवेंद्र फडणवीस यांना दिलेला इशारा महाराष्ट्रातल्या युवकांनी ठरविले, तर पवारांच्याच राजकीय दृष्ट्या अंगलट आणू शकतील.

    – घरे आधीच जाळलीत

    राहता राहिला जाळपोळीचा मुद्दा. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या आधी हा प्रयोग मराठवाड्यात होऊन गेलाय. त्यात “पवार संस्कारित” आमदारांचीच घरे जाळली गेली होती. हा इतिहास फार जुना नाही. अगदी नऊ – दहा महिन्यांपूर्वीचाच आहे, हे विसरून चालणार नाही.

    Sharad Pawar warned Nepal like violence in Maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुद्दा ओल्या दुष्काळाचा आणि शेतकरी कर्जमाफीचा, पण “स्वप्न” महाराष्ट्राचा “नेपाळ” करायचा!!

    Ajit Pawar : पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून बीड जिल्ह्याला गिफ्ट ; दीडशे कोटींचा निधी वितरित

    Sharad Pawar : “देवा भाऊ, शिवाजी महाराजांचे नाव घेता, पण बळीराजाकडे ढुंकूनही पाहत नाही!” नाशिक मधील भाषणात काय म्हणाले शरद पवार